पीटीआय, मुंबई

युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसला (यूपीआय) मोठे यश मिळाले असून, निर्माती कंपनी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे (एनपीसीआय) बाजारपेठेत वर्चस्व निर्माण झाले आहे, अशी टीका होत आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरूवारी ही टीका फेटाळून लावली. देयक उपयोजनाच्या वाढीसाठी अद्याप खूप वाव असून, ती जगातील आघाडीची देयक प्रणाली बनू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यूपीआय सध्या भारतासोबत सिंगापूर आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये कार्यान्वित झालेली आहे. यूपीआयच्या माध्यमातून होणारे मासिक व्यवहार १०० अब्जांच्या पुढे गेले आहेत. त्यामुळे तिचे बाजारपेठेत वर्चस्व निर्माण झाल्याचा आरोप होत आहे. याबाबत दास म्हणाले की, यूपीआय ही अतिशय उत्कृष्ट प्रणाली आहे. ती डिजिटल पायाभूत सुविधा बनली आहे. तिची वाढ अजूनही सुरू आहे. ती जगातील सवोत्कृष्ट प्रणाली बनली आहे. ती जगातील आघाडीची प्रणाली बनावी, अशी माझी इच्छा आहे.

हेही वाचा >>>Money Mantra: फंड विश्लेषण- टाटा लार्ज कॅप फंड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रिझर्व्ह बँकेककडून डिजिटल रुपयावर भर देत आहे. सरकारी अंशदान अथवा इतर मोबदल्यासाठी डिजिटल रुपयाचा वापर करण्याबाबत विचार सुरू आहे. आम्हाला सध्या कोणतीही घाई नाही. आम्ही आमची नवीन चलन व्यवस्था निर्माण करीत आहोत, असे दास यांनी नमूद केले.