M Ambika Gets Law Degree At Age Of 46 : वयाला शिक्षणाचे बंधन नसते असं म्हणतात. फक्त लागते ती जिद्द, आत्मविश्वास आणि काहीतरी करून दाखवण्याची हिंमत. तर हीच हिंमत ४६ वर्षांच्या एम अंबिका यांनी दाखवली आणि त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णय घेतला. तर कोण आहेत एम अंबिका? त्यांच्या आयुष्यातील हा निर्णय कोणता आहे याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…
तर १ जून रोजी ४६ वर्षांच्या एम अंबिका यांनी केरळच्या बार कौन्सिलमध्ये वकिलीसाठी स्वतःची नोंदणी केली. एलएलबी पदवी मिळवण्याचे त्यांचे स्वप्न होते आणि हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना सामाजिक तिरस्काराचा सामना करावा लागला. एवढेच नव्हे तर घरगुती जीवन आणि शैक्षणिक क्षेत्रातील स्पर्धात्मक मागण्यांनाही तोंड द्यावे लागले.
एम अंबिका केरळमधील त्रिशूर येथील रहिवासी आहेत. लहानपणी त्या १ वर्षाच्या होत्याआई आणि ८ वर्षांची त्यांचे बाबा देवाघरी गेले. त्यांचे संगोपन एका आजीने केले होते ज्या काही आजारी पडल्या आणि मग त्यांना मोठ्या बहिणीवर अवलंबून राहावे लागले, जी भारतीय रेल्वेमध्ये सफाई कामगार होती. एम अंबिका हायस्कूलची विद्यार्थिनी असताना, त्यांना ओट्टापलम येथे वसतिगृहात ठेवण्यात आले होते. एक हुशार विद्यार्थिनी असूनही अनाथ असल्याने त्यांना खूप त्रास झाला. त्यामुळे अभ्यासातून त्यांची आवड हळूहळू कमी झाली आणि १९९४ मध्ये दहावीच्या परीक्षेत त्या नापास झाल्या.
त्यानंतर वयाच्या १८ व्या वर्षी अंबिका यांचे लग्न त्रिशूरमधील मन्नम्बेट्टा गावातील रहिवासी एन. व्ही. अय्यप्पन यांच्याशी झाले; जे कॅसेटचे दुकान आणि टेलिफोन बूथ चालवत होते. २२ व्या वर्षापर्यंत त्या दोन मुलांची आई होत्या. त्या संसारात आनंदी होत्या. पण, त्यांचे आनंदाचे दिवस फार काळ टिकले नाहीत. त्यांच्या मुलीला अनेक आरोग्य समस्या होत्या. तिला अंशतः श्रवणशक्ती कमी होती. तिच्या उपचारांसाठी केरळ आणि बाहेरील अनेक रुग्णालयात दोघेही नवरा-बायको गेले आणि सर्व बचत तिच्या उपचारातच संपवली.
त्यांच्या मुलीला एका विशेष शाळेत दाखल केल्यानंतर, अंबिका आणि अय्यप्पन यांनी देवतांच्या बहुसंगमरवरी मूर्ती बनवणाऱ्या एका कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. २००९ मध्ये, अंबिका त्रिशूरमधील स्थानिक पंचायत वाचन कक्षात साक्षरता प्रवर्तक ओमाना थानक्कप्पन यांना भेटली. या भेटीमुळे तिचे आयुष्य बदलले. साक्षरतेचे वर्ग वाचनालयात आयोजित केले जात होते. त्यामुळे अंबिका यांना तिच्या नवऱ्याने दहावीच्या समकक्ष कार्यक्रमात सामील होण्यास सांगितले. त्यांच्या मुलीच्या आरोग्याच्या समस्यांमुळे तिची अजिबात इच्छा नव्हती. पण, त्यांच्या नवऱ्याने या कार्यक्रमात सामील होण्यास प्रोत्साहित केले.
यामुळे एलएलबी पदवी मिळवण्याचे जुने स्वप्न पुन्हा जागृत झाले. मन्नम्बेट्टा गावात राज्याने बारावीच्या समकक्ष अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी त्यांना २०१७ पर्यंत वाट पहावी लागली. १२वीच्या अभ्यासक्रमाच्या वर्गांना उपस्थित राहताना, त्या कामापासून दूर राहिल्या. हे वर्ग फक्त रविवारीच घेतले जात असले तरी त्यांच्या नवऱ्याने त्यांना शिक्षणावर लक्ष केंद्रित करायला सांगितले. त्यामुळे २०१८ मध्ये, बारावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली.
अभ्यास सुरू ठेवायचा होता म्हणून अंबिका यांनी पाच वर्षांचा एलएलबी अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्रिशूरमध्ये एका लहान प्रवेश प्रशिक्षण कार्यक्रमानंतर, अंबिका पलक्कडच्या कुलापुल्ली येथील अल अमीन अभियांत्रिकी महाविद्यालयात कायद्याच्या अभ्यासक्रमात प्रवेश मिळवू शकली. वर्गात सामील झाल्या तेव्हा त्या ४० वर्षांच्या होत्या. त्यांच्या मुलांच्या वयाच्या विद्यार्थ्यांमध्ये बसण्याचा अनुभव खूपच अद्भुत होता. तेथील विद्यार्थ्यांनी अंबिका यांना मोठी बहीण म्हणून पाहिले. त्यामुळे त्यांच्या सर्व शंका दूर झाल्या.
कॉलेजला जाण्यासाठी दीड तासाचा ट्रेन प्रवास (M Ambika Success Story)
तरीही, त्यांच्यासाठी कॉलेज हा आणखी एक संघर्ष होता. फक्त घरकामं नाही तर दररोज कॉलेजला जाण्यासाठी दीड तासाचा ट्रेन प्रवास करावा लागत होता. त्यामुळे मुलीला शेजाऱ्यांकडे ठेवून जावे लागायचे. यामुळे वारंवार शेजाऱ्यांकडूनही तिरस्कार सहन करावा लागला, त्यांना आश्चर्य वाटायचे की,”या वयात का शिक्षण घ्यायचे आहे?”. तसेच घरी अंबिका यांना अभ्यास करायला वेळ मिळत नव्हता. मुलगी झोपल्यानंतरच अभ्यास करावा लागत असते. म्हणून म्हणून त्या ट्रेनमध्ये अभ्यास करायच्या. अंबिका यांचा मुलगा अनंतू जो इंग्रजीमध्ये पदव्युत्तर विद्यार्थी होता. त्यांच्या शालेय जीवनात, अंबिका त्याच्या शंका दूर करायच्या. पण जेव्हा अंबिका कायद्याचे शिक्षण घेत होत्या तेव्हा आमच्या भूमिका उलट्या झाल्या आणि त्याने अंबिका यांना भरपूर मदत केली. त्यांच्या नवऱ्याने तिला शिक्षण पूर्ण करण्यासाठी पाठिंबा आणि प्रोत्साहन दिले. अनेक वेळा, तो अंबिकाच्या मुलीची आई बनला. बायकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने कुटुंब चालवण्याची जबाबदारीही घेतली.
अंबिका यांच्या शिक्षण घेण्याच्या दृढ निर्णयामुळेच ती हे स्वप्न पूर्ण करू शकली. अन्यथा, ती फक्त गृहिणी म्हणून मर्यादित राहिली असती. त्यांना जाणवले होते की, शिक्षणामुळे समाजात व्यक्तीला प्रतिष्ठा मिळते. जरी समाजातील अनेक लोकांनी या वयात महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची खिल्ली उडवत असली त्यावेळी त्यांचे कुटुंब त्यांच्या निर्णयाच्या बाजूने उभे राहिले. त्यांच्यामुळे एम अंबिका यांचा निर्धार आणखी बळकट झाला ; असे त्यांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितले. यामुळे एम अंबिका यांनी वकील म्हणून नोंदणी केल्याने त्यांच्या आयुष्यातील नवीन टप्पा सुरू झाला. गेल्या वर्षी त्यांनी ६० टक्के गुणांसह परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर पदवी मिळवली.