– आसावरी काकडे

‘भीतीची आणि माझी फार जुनी मैत्री आहे. कितीही प्रयत्न केला तरी ती मला सोडत नाही. नेमानं मनाचं दार ठोठावत येते आणि घट्ट मिठी मारून बसते. पण ही भीती फक्त सोबत करत असते, काही करायला रोखून धरत नाही, हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा तिच्या सर्वसाक्षी आणि सर्वव्यापी असण्यातलं रहस्यही लक्षात आलं.’

Parenting, control, freedom, ideal parenting, parent child relationship, discipline, authority, family dynamics, , communication, conflict, grandparent influence, parental boundaries, chaturang article,
सांधा बदलताना : पालकत्वाच्या मर्यादा
Paranoid Personality Disorder, PPD, personality disorders, behavioral patterns, mental health, psychotherapy, DSM-5, family dynamics, trust issues, mental illness, symptoms, treatment, chaturang article,
स्वभाव – विभाव : ते असे का वागतात?
Shrawan 2024 Rashi Bhavishya
श्रावण सुरु होताच ‘या’ तीन राशींवर भोलेनाथांची कृपा बरसणार; दुःख- संकट वाटेतून होतील दूर, प्रचंड धनलाभाचा योग
Loksatta  Chaturang A trail of fear Experience the body
भय भूती : …आणि भीतीचा मागमूसही उरला नाही!
To avoid workplace stress career
ताणाची उलघड: कामाच्या ठिकाणी येणारा ताण टाळण्यासाठी…
benefits of pumpkin seeds
भोपळ्याच्या बिया अन् निळ्या रंगाच्या ‘या’ फळामुळे होणारे फायदे वाचा, सेवन करण्याची योग्य वेळ कोणती?
Shani Sadesati when will mesh rashis shani sadesati will start people need to be careful
मेष राशीची साडेसाती नेमकी केव्हा सुरू होणार आहे? सावध राहण्याची गरज; जाणून घ्या, ज्योतिषशास्त्र काय सांगतात…
My friend Half a century of friendship
माझी मैत्रीण : मैत्रीचं अर्धशतक!

अनेक भावभावनांचा गुंता असलेलं मानवी मन हे एक न सुटलेलं कोडं आहे. कोणतीही एक भावना स्व-स्वरूपात एकटी नसते. कारण आणि परिणामरूपात प्रत्येक भावना इतर भावनांच्या आगेमागे रेंगाळत असते. भीती या भावनेचा विचार करायचा, तर रोजच्या जगण्यात वैयक्तिक आणि सामाजिक स्तरावर ती काळजी, तणाव, अस्वस्थतेच्या रूपात सोबत असते. मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे भीती. ‘भय इथले संपत नाही..’ हे पटतं बऱ्याचदा.

हेही वाचा – सांधा बदलताना : जुडे वाद-संवाद तो हितकारी…

भीतीची आणि माझी फार जुनी मैत्री आहे. मी तिला दूर करायचा कितीही प्रयत्न केला तरी ती मला सोडत नाही. ‘नेमेची येतो मग पावसाळा’सारखं वादळ-वारा, विजा, गडगडाट, धुवांधार पाऊस.. हे सर्व नेहमी अनुभवाला येणारं. तरी या वातावरणात भीतीही नेमानं मनाचं दार ठोठावत येते. भीतीला माझ्या मनाचा रस्ता इतका सवयीचा झालाय, की अशी कुठली चिन्हं जरी दिसली तरी ही सरळ येते मनात. एकदा अशीच आली पावसाच्या पाठोपाठ आणि मला मिठी मारून बसली. तेव्हा घाबरलेल्या मला माझ्यातल्या निरीक्षक ‘मी’नं समजावलं, ‘तू ती नाहीस धडधडत आत बसलेली.. बाहेर कोसळतेय, गडगडतेय, चमकतेय, ती तू आहेस.!’ पण कवितेनं घातलेली अशी समजूत उंच उडीसारखी क्षणार्धात जमिनीवर आणणारी असते. ती कायम सोबतीला राहात नाही.

भीतीची एक संस्मरणीय आठवण असंच एक शहाणपण हातात ठेवणारी आहे.. एकदा आम्ही तिघी मैत्रिणी वेताळ टेकडीच्या पुढे दगडाच्या खाणी आहेत तो परिसर बघायला गेलो होतो. संध्याकाळचे सहा वाजून गेलेले. आकाशात काळ्या ढगांनी गर्दी करायला सुरुवात केली होती. वादळ, वावटळ दबा धरून बसल्याच्या खुणा वातावरणात स्पष्ट दिसत होत्या. आणि आम्ही तिघी निघालो होतो. दुतर्फा पसरलेली झाडी पूर्णत: झडून नग्न झालेली. आमच्या मागे-पुढे कोणी दिसत नव्हतं. क्वचित कोणी दिसत होतं ते परत येतानाच. आणि आम्ही पुढे चाललो होतो. गप्पा तत्त्वज्ञानाच्या, शहाणपणाच्या, उभारी धरण्याच्या युक्त्यांच्या. मनात मात्र भीतीनं पंख पसरलेले. त्या पंखांनी अंतराकाश झाकोळून टाकलेलं. डोळ्यांनी सौंदर्य टिपण्याचं आणि मेंदूपर्यंत पोहोचवण्याचं आपलं काम केलेलं. पण भीतीनं संवेदनांच्या दारावर नजर ठेवलेली.

गप्पा मारत आम्ही पुढे पुढे चाललो होतो. परत जाऊ या, असं वाटणं मी आत दडवून ठेवलं होतं. माझं लक्ष गप्पा, आतली भीती आणि बाहेरचा भिववणारा भव्य निसर्ग या तिघांत विभागलं गेलं होतं. चालता चालता अखेर दगडाच्या खाणींचं ते ठिकाण आलं. इतक्या दूरवर माणसांची रहदारी बेताची, तरी आधार वाटेल इतपत होती. तिथे जरा निवांत बसलो. छान वाटत होतं. पण तिकडे पुरेसं लक्ष जात नव्हतं. ते भीतीनं वेधून घेतलं होतं. आता उठू या, असं मी म्हणायच्या आतच मैत्रीण म्हणाली आणि आम्ही परतायला लागलो. परतीच्या प्रवासातही ती भीती होतीच, पण भीती घाबरवून मनासमोर जे चित्र उभं करत होती तसं काही झालं नाही. वादळ-वारा-विजा-पाऊस.. काहीच नाही. हायसं वाटलं. आम्ही सुखरूप घरी पोहोचलो!

भीतीचा हा अनुभव डायरीत नोंदवून ठेवावा असा झाला. लिहिताना लक्षात आलं, की भीती फक्त सोबत करत होती. तिनं मला रोखून धरलं नव्हतं. डायरीत लिहिताना मला फक्त भीती नाही, तो सर्व परिसर भव्य सौंदर्यासह आठवत होता. म्हणजे भीती सर्वव्यापी नव्हतीच तर! तिच्याशिवाय इतर बरंच काही अनुभवता आलेलं होतं. ‘अंग दुखतंय’ असं आपण म्हणतो तेव्हा दुखून लक्ष वेधणारा अवयव एखाद-दुसराच असतो. बाकी सगळे अवयव मजेत असतात. तसंच काहीसं.

असंही लक्षात आलं, की भीती फक्त ‘असं झालं तर..’ अशा कल्पनांचं बोट धरून मनात शिरत असते आणि आपल्याला सावध करत असते. भीती ही एक आवश्यक भावना आहे खरं तर. आपण लहान मुलांना ‘पडशील’, ‘लागेल’, ‘भाजेल’, ‘कापेल’, असं म्हणतो तेव्हा नकळत भ्यायला शिकवत असतो. मुलांच्या मनात धावण्याची पडण्याशी, सुरी-कात्रीची कापण्याशी सांगड घातली जाते. यातून मुलं त्या त्या संदर्भात काळजी घ्यायला शिकतात. पण कधी कधी एखाद्या गोष्टीची मनात कायमची भीती बसू शकते. मग ‘डर के आगे जीत हैं’ असं समजवावं लागतं. साहस करायला प्रोत्साहन द्यावं लागतं. मुलांना घडवण्याच्या या दोन पातळ्यांवरच्या दोन प्रक्रिया आहेत.

घरातले संस्कार, ‘जीन्स’मधून आलेलं पूर्वसंचित आणि जगताना येणाऱ्या अनुभवातून आपण घडतो. व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणतात. कुणाला पाण्याची भीती वाटते, कुणाला अंधाराची, कुणाला ‘लोक काय म्हणतील’ याची.. धीट माणसालाही कसली ना कसली भीती वाटत असते. तो गर्दीत शिरून भांडण सोडवेल, अपघातग्रस्ताला अशक्य वाटणारी मदत करेल, पण त्याला स्टेजवर उभं राहून बोलायची भीती वाटू शकते. मीही घाबरट आहे. बऱ्याच गोष्टींची मला भीती वाटते. पण ‘लोक काय म्हणतील’ याची मला भीती वाटत नाही.

आपल्याला बऱ्याचदा अकारणच भीती वाटते. अस्वस्थ करते. ती रिकामेपणाची भीती असते. माणसाला जाणीव असते आणि जाणीव आहे याचंही भान असतं. या विश्वातील इतर सर्व घटक विश्वाचा अविभाज्य भाग असतात. पण जाणीव असल्यामुळे माणूस एकूण अस्तित्वाचा अविभाज्य भाग होऊ शकत नाही. तो वेगळेपणानं विश्वाकडे आणि स्वत:कडेही पाहू शकतो. या जाणिवेला सतत काहीतरी विषय लागतो. तो मिळाला नाही की माणूस अस्वस्थ होतो. त्याला त्या रिक्ततेची भीती वाटते. माणसाच्या स्वरूपाचा शोध घेणाऱ्या अस्तित्ववादी लेखनात या अवस्थेला anguish म्हटलं आहे. अस्तित्ववादी कादंबऱ्यांमधील नायक अशी अस्वस्थता अनुभवत जगण्याचा अर्थ शोधत असतो. मी इथे का आहे? असा निरुत्तर करणारा मूलभूत प्रश्न त्याला पुन्हा पुन्हा निरर्थकतेच्या गर्तेत ढकलत राहतो! विचार करणाऱ्या सर्जक मनाला अशी भीती व्याकूळ करते. त्यातून कधी कधी श्रेष्ठ कलाकृती जन्माला येते. सर्वसामान्य माणूसही व्याकूळ करणारी अशी भीती अनुभवत असतो, पण बहुतांश माणसं तिला सामोरं न जाता तिच्यापासून पळ काढतात.

जगताना भेडसावणाऱ्या अशा सगळ्या निरुत्तर करणाऱ्या प्रश्नांना ‘ईश्वर’ हे तयार उत्तर पळ काढण्यासाठी सहज उपलब्ध असतं. वेगवेगळ्या प्रकारच्या भीतींमधून आधार देणाऱ्या ईश्वराची निर्मिती झाली. कुणीतरी विश्वनियंता आहे ही भावना दिलासा देणारी असते. भवितव्याबद्दलच्या काळजीतून भीती निर्माण होते. ती अस्वस्थ करते. मानवी प्रयत्न थिटे पडतात. कित्येकदा परिस्थिती हाताबाहेर जाते. अशा कोणत्याही वेळेस शरण जावं, आधार घ्यायला धाव घ्यावी, असं समर्थ ठिकाण ईश्वररूपात आपल्या हाताशी असतं. असे आधार गृहीत धरून बहुतांश माणसं स्वत:ला सावरत, कुणाच्या वाट्याला न जाता जगत असतात. काही दादागिरी करत असतात. त्यांचं वागणं घाबरवणारं असतं. पण खरं तर ती स्वत:च आतून घाबरलेली असतात. त्यांचा अहंकार त्यांना ते मान्य करू देत नाही. वरवर दिसणाऱ्या त्यांच्या मग्रुरीच्या मुळाशी भीती असते. मोठमोठ्या लढाया, महायुद्धं, स्वत:चं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी होत असतात. अशी आक्रमणं, अत्याचार करणाऱ्या क्रूर वृत्तींच्या मुळाशीही भीतीच असते. आपल्याला कोणी शह देऊ नये, आपल्या स्थानाला धक्का लागू नये म्हणून अशी दहशत पसरवली जाते की कुणी मान वर करून बघू नये, विरोधी बोलू नये, लिहू नये..

आक्रमकता, हिंसा, भीती, प्रेम, द्वेष, राग.. अशा मानवी भावना एकमेकींत गुंतलेल्या असतात. माणसं, घटना, प्रसंग समजून घेताना ही गुंतागुंत समजून घ्यावी लागते. त्यासाठी ‘इमोशनल इंटलिजन्स’ची गरज असते. बऱ्याचदा माणसाची ‘तो भयाने फांदीला बिलगून बसला/ पंख होते लाभले नाही कळाले..!’ अशी अवस्था असते. त्याला त्याच्या क्षमतांच्या पंखांची जाणीव करून द्यावी लागते.

कधी कधी काही प्रेरणा भीतीपेक्षा वरचढ ठरतात आणि बेभान होऊन माणसं कृती करून जातात. महापूर आलेल्या यमुनेतून नवजात बालकाला घेऊन निघालेल्या वसुदेवाची गोष्ट किंवा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ ही ऐतिहासिक घटना सर्वश्रुत आहे. सामान्य माणसंही अशा कृती करत असतात. गिर्यारोहणासारख्या वेगवेगळ्या साहसी मोहिमा यशस्वी करणारी किती तरी माणसं असतात.

हेही वाचा – बुद्धी-मनाचा तोल!

नैसर्गिक आपत्तींची टांगती तलवार, जुलमी राजवट, दहशती हल्ले, वेगवेगळ्या साथी.. अशा गोष्टींची भीती समाजमनात सतत असते. संपूर्ण जगानं करोनाच्या दहशतीचा अनुभव नुकताच घेतलेला आहे. जगभरातल्या न परतीच्या वाटेवरच्या विकासाच्या सर्व गोष्टींचे ‘साइड इफेक्ट्स’ आपल्याला भोगावे लागत आहेत. त्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वेगवेगळ्या कारणांनी होणारी पर्यावरणाची हानी. माणूस संपूर्ण पृथ्वीला कुठल्या गर्तेत घेऊन चालला आहे, याची जाणीव जाणकार अभ्यासक सतत करून देत असतात. पण अशा सामूहिक भीतीनं कोणी फारसं अस्वस्थ होत नाही.

हल्लीच्या इंटरनेटच्या जगात भीतीनं वेगळंच रूप धारण केलं आहे. आपण काय करतो, कुठे जातो, काय पाहतो, काय खातो.. या सर्वांवर नजर ठेवली जाते. आपण आपली ‘प्रायव्हसी’ गमावलेली आहे. वेगवेगळ्या धोक्यांवर उपाय म्हणून कडेकोट सुरक्षाव्यवस्था केली जाते. पण सोशल मीडियामुळे आपण उघडे पडत चाललो आहोत. याविषयीची माहिती करून घेऊ, तेवढी भीती गडद होत जाते.

जगताना काळाच्या ओघात वाट्याला येणारी प्रत्येक परिस्थिती म्हणजे सुविधांची किंमत वसूल करणारं एक ‘पॅकेज डील’ असतं. आणि ते आपण जन्मत:च स्वीकारलेलं असतं. परंतु माणसाची जिजीविषा इतकी प्रबळ असते, की कुठूनही, केव्हाही हल्ला करणाऱ्या भीतीनं कितीही घाबरवलं, तरी तिला मनाच्या तळात दाबून ठेवत माणूस आयुष्य उपभोगत असतो. सर्व प्रकारचे सणवार, लग्न-समारंभ, पार्ट्या, मेळावे, शिबिरं, वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम, सर्व सुखेनैव चाललेलं असतं! जगताना ठायी-ठायी भेटणारी भीती सर्वसाक्षी असली तरी सर्वव्यापी नसतेच तर!

asavarikakade@gmail.com