अनेकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर निरनिराळ्या कारणांवरून पाकिस्ताननं भारताला घेरण्याचा प्रयत्न केला होता. परंतु असं असतानाही पाकिस्तानच तोंडावर पडल्याचं पाहायला मिळालं होतं. तसंच दहशतवादाला खतपाणी घालण्याच्या आरोपावरूनही अनेकदा पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतानं घेरलं होतं. दरम्यान, जम्मू काश्मीरबाबत पाकिस्ताननं कुरापती करणं सोडून द्यावं. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता आणि कायम राहिल, असं म्हणत भारतानं पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला चपराक लगावली आहे. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहिल, असं प्रतिक्रिया काऊंटर टेररिजमचे परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव महावीर सिंघवी व्यक्त केली. 'UNOCT व्हर्च्युअल काऊंटर टेररिझम विक'ला संबोधित करताना ते बोलत होते. "जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सुरू असलेल्या कुरापती आता थांबवल्या पाहिजेत. पाकिस्तानकडून दुसरंच काही दाखवण्याचा प्रयत्न होतो. परंतु ते जे करत आहेत तो म्हणजे प्रायोजित सीमापार दहशतवाद आहे," असं सिंघवी म्हणाले. While, the whole world including India, has undertaken proactive steps to promote human rights and build resilience against terrorism,Pakistan has main-streamed terrorism as statecraft:Mahaveer Singhvi,Joint Secy for Counter Terrorism, MEA at UNOCT Virtual Counter-Terrorism Week — ANI (@ANI) July 9, 2020 Jammu&Kashmir has been, is&will continue to remain an integral part of India&Pakistan should cease to covet it. What is portrayed by Pakistan is actually state-sponsored cross border terrorism: Mahaveer Singhvi, Joint Secretary for Counter Terrorism, MEA — ANI (@ANI) July 9, 2020 "पाकिस्तानकडून सुरू असलेल्या प्रॉक्सी वॉर आणि प्रायोजित सीमापार दहशतवादानंतरही काश्मीरमधील जनतेने भारतीय लोकशाहीवर आपला विश्वास कायम ठेवला आहे आणि भारताने याचा नेहमीच पुनरुच्चार केला आहे," असं सिंघवी यांनी स्पष्ट केलं. "भारतानं कायमच जगभरात मानवाधिकाराचं जतन करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं काम केलं आहे. तसंच दहशतवादाविरोधात कायम कठोर भूमिका घेतली आहे. दहशतवादाविरोधात भारतानं कायम पावलं उचलली आहेत. परंतु पाकिस्ताननं कायमच दहशतवादाला मुख्य प्रवाहात ठेवलं आहे," असंही ते म्हणाले.