राज्य सरकार चालवत असताना सत्तारूढ पीडीपी व भाजप यांच्यात समन्वय नसल्याचा आरोप मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने केला आहे. पाकिस्तानी ध्वज फडकावणे किंवा खलिस्तानवाद्यांची निदर्शने या बाबी पाहता राज्यातील जातीय सलोखा धोक्यात आल्याची टीका माकपचे नेते मोहम्मद युसुफ तारिगामी यांनी केली आहे. जम्मूतील घटना  नीट हाताळता आली नाही, असा आरोप त्यांनी केला.