मोदी सरकारच्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प आज हंगामी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी लोकसभेमध्ये सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये मध्यमवर्गीयांना पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर करमुक्तीची घोषणा करुन मोठा दिलासा मोदी सरकारने दिला आहे. याशिवाय शेतकरी, कामगार, सैनिकांसाठीही अर्थसंकल्पामध्ये घोषणा करण्यात आल्या. पंतप्रधान मोदींनी या अर्थसंकल्पाचे कौतूक करत नवीन भारताच्या पायाभरणीसाठी हा अर्थसंकल्प असल्याचे म्हटले आहे. तरी विरोधकांनी हा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सादर केलेला अर्थसंकल्प असल्याची टिका केली आहे. विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांनी ट्विटवरुन या अर्थसंकल्पावर टिका केली आहे. विरोधीपक्षातील नेते काय म्हणाले आहेत या अर्थसंकल्पाबद्दल बोलताना जाणून घेऊयात.

झूठ की टोकरी जुमलों के बाज़ार में: लालूप्रसाद यादव

शेवटचा जुमला: अरविंद केजरीवाल</p>

गोयल यांच्या एकाही शब्दावर विश्वास नाही: संजय निरुपम

मध्यमवर्गीयांनी दिले १६ लाख कोटी: संजय झा

विश्वास कसा ठेवायचा: विखे-पाटील

मदतीचा अर्थ शेतकऱ्यांचे नुकसान झालेय: पृथ्वीराज चव्हाण

नेहमीच सर्वांना फसवू शकत नाही: दिग्विजय सिंह

मतांवर डोळा ठेऊन सादर केलेले बजेट: धनंजय मुंडे</p>

त्याने प्रश्न सुटणार नाही: मलिंद देवरा

वेगळे मंत्रायल देण्याची घोषणा केली होती पण…: शशी थरुर

अर्धवट बजेट: जयंत पवार

खूप मोठं गाजर दाखवलयं: अजित पवार</p>

दरम्यान या अर्थसंकल्पाचे भाजपाच्या सर्व नेत्यांनी स्वागत केले आहे. नवीन भारताचा पाया उभारणारे हे बजेट असल्याचे मत मंत्रिमंडळामधील अनेक नेत्यांनी ट्विटवरुन व्यक्त केले आहे.