विष पेरण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करू नका असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले ज्यानंतर कवी आणि टीकाकार संपत सरल यांनी ट्विट करत याला उत्तर दिले आहे. अक्षय कुमार जगात कुठेही राहिला त्याने भारतीय नागरिकत्त्व सोडू नये, विजय मल्ल्याने वेळेत कर्ज परत करावे, अमित शाह यांनी मॉर्निंग वॉकसाठी वेळेवर जावे, गायीपेक्षा माणसातले माणूसपण योगी आदित्यनाथांनी ओळखावे, पत्रकार सुधीर चौधरींनी दलाली सोडावी, दुसऱ्याचे वडिल म्हणजेच आपले वडिल असे संबित पात्रा यांनी म्हणणे सोडावे या आशयाचे खोचक ट्विट करत संपत सरल यांनी मोदींच्या आवाहनावर टीका केली आहे. या ओळींमधून ज्या व्यक्ती जशा नाहीत त्यांनी ते आचरणात आणावे असा सल्ला संपत सरल यांनी दिला आहे.