भारतीय जवानांनी सप्टेंबर महिन्यात सीमेपलीकडून होणारे घुसखोरीचे अनेक प्रयत्न हाणून पाडले असून पूरस्थितीचा फायदा घेऊन काश्मीर खोऱ्यात घुसण्याच्या प्रयत्न करणाऱ्या १४ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. त्याचप्रमाणे सहा दहशतवाद्यांना अटकही करण्यात आली आहे.
पूरस्थितीमुळे दहशतवादी कारवायांकडे काहीसे दुर्लक्ष झाल्याने त्याचा फायदा उठवून घुसखोरीचे प्रयत्न झाले. मात्र दहशतवादाला प्रत्युत्तर देणाऱ्या यंत्रणेमुळे त्यांचे प्रयत्न हाणून पाडण्यात आले, असे संरक्षण दलाचे प्रवक्ते कर्नल एस. डी. गोस्वामी यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 14 militants killed by indian army in september
First published on: 05-10-2014 at 04:57 IST