भारतात २०२० मध्ये दररोज सरासरी ८० खून आणि ७७ बलात्काराच्या घटना घडल्या आहेत, ही आकडेवारी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (NCRB) अहवालातून समोर आली आहे. २०२० मध्ये दररोज सरासरी ८० हत्यांसह भारतात एकूण २९,१९३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. हत्येच्या सर्वाधिक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडल्या. २०१९च्या तुलनेत २०२०च्या आकडेवारीत १ टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. २०१९मध्ये दिवसाला सरासरी ७९ हत्यांसह एकूण २८,९१५ जणांची हत्या झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२०२० मध्ये देशभरात सर्वाधिक ३ हजार ७७९ हत्येच्या घटनांची नोंद उत्तर प्रदेशमध्ये नोंदवली गेली. त्यानंतर, ३,१५० बिहारमध्ये आणि तिसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र असून राज्यात २,१६३ हत्या झाल्या आहेत. तर, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये १,९४८ खुनाचे गुन्हे दाखल झाले. तसेच राजधानी दिल्लीत २०२० या वर्षभरात ४७२ खून झाले, असंही या आकडेवारीत म्हटलंय.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 80 murders 77 rape cases daily in 2020 report reveals about crime against woman in india hrc
First published on: 16-09-2021 at 16:09 IST