पश्चिम बंगालमध्ये अम्फन वादळाने घेतलेल्या बळींची संख्या आता ८५ झाली असून विद्युत व पाणीपुरवठा बंद झाल्याने लोकांनी कोलकात्यात प्रशासनाविरोधात निदर्शने करून रास्ता रोको आंदोलन केले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दक्षिण २४ परगणा जिल्ह्य़ास भेट देऊन पाहणी करण्याचे ठरवले.  वादळात अनेक घरे व झाडे कोसळली. अधिकृत माहिती नुसार १.५ कोटी लोकांना फटका बसला असून १० लाख घरे पडली आहेत. वीज व मोबाइल सेवा काही प्रमाणात सुरळीत झाली असली, तरी कोलकाता, उत्तर व दक्षिण २४ परगणा भागात अजून काही ठिकाणी वीज नसल्याने अंधारच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 85 killed in west bengal storm abn
First published on: 24-05-2020 at 00:47 IST