भारताचे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी आज देशातील लोकांना स्वतःच्या अस्मितेचा अभिमान बाळगण्यास शिकण्यास सांगितले. त्यांनी मॅकॉले शिक्षण पद्धतीला संपूर्णपणे नाकारण्याचे आवाहन केले. मेकॅलो शिक्षण पद्धतीने देशात शिक्षणाचे माध्यम म्हणून परदेशी भाषा लादली आणि शिक्षण उच्चभ्रू लोकांपर्यंत मर्यादित केलं, त्यामुळे ही पद्धती नाकारण्याचं आवाहनही नायडू यांनी केलं आहे.


“शतकांच्या वसाहतवादी राजवटीने आपल्याला स्वतःकडे एक कनिष्ठ वंश म्हणून पाहण्यास शिकवले. आपल्याला आपल्या संस्कृतीचा, पारंपारिक शहाणपणाचा तिरस्कार करण्यास शिकवले गेले. यामुळे एक राष्ट्र म्हणून आपली वाढ मंदावली. आपल्या शिक्षणाचे माध्यम म्हणून परदेशी भाषा लादल्यामुळे शिक्षण मर्यादित झाले. समाजाचा एक छोटासा घटक, मोठ्या लोकसंख्येला शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित ठेवतो,” असे उपराष्ट्रपती नायडू यांनी हरिद्वार येथील देव संस्कृती विश्व विद्यालयात दक्षिण आशियाई शांतता आणि सामंजस्य संस्थेचे उद्घाटन केल्यानंतर आपल्या भाषणात सांगितले.

former Vice President M Venkaiah Naidu criticises freebies trend
पक्ष बदलला की जुन्या नेत्यांना शिव्या देणं चुकीचं: माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची टीका
loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…


“आपल्या वारशाचा, आपल्या संस्कृतीचा, आपल्या पूर्वजांचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. आपण आपल्या मुळांकडे परत जायला हवे. आपण आपली वसाहतवादी मानसिकता सोडून दिली पाहिजे आणि आपल्या मुलांना त्यांच्या भारतीय अस्मितेचा अभिमान बाळगायला शिकवले पाहिजे. आपण तितक्या भारतीय भाषा शिकल्या पाहिजेत. आपण आपल्या मातृभाषेवर प्रेम केले पाहिजे. ज्ञानाचा खजिना असलेले आपले धर्मग्रंथ जाणून घेण्यासाठी आपण संस्कृत शिकली पाहिजे,” असे उपराष्ट्रपती नायडू म्हणाले.


“आपल्यावर शिक्षणाचे भगवीकरण केल्याचा आरोप आहे, पण मग भगव्यामध्ये काय चूक आहे? सर्वे भवनतु सुखिनः (सर्व सुखी रहा) आणि वसुधैव कुटुंबकम (जग एक कुटुंब आहे), जे आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये समाविष्ट असलेले तत्वज्ञान आजही परराष्ट्र धोरणाचा भाग आहेत, ही भारताची मार्गदर्शक तत्त्वे आहेत. ,” उपराष्ट्रपती नायडू म्हणाले.