पीटीआय, नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले, की स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापनदिनानिमित्त साजरा केला जाणाऱ्या ‘अमृत महोत्सवा’स एका व्यापक लोकचळवळीचे रूप येत आहे, समाजाच्या सर्व स्तरांतील आणि वर्गातील नागरिक त्यात सामील झाले आहेत. तिरंगा ध्वजाची रचना करणाऱ्या पिंगली व्यंकय्या यांची २ ऑगस्ट ही जयंती आहे, त्यामुळे २ ते १५ ऑगस्टदरम्यान सर्व नागरिकांनी आपल्या विविध समाजमाध्यम खात्यावर तिरंग्याचे छायाचित्र ‘प्रोफाइल पिक्चर’ म्हणून ठेवण्याचे आवाहनही त्यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोदींच्या आकाशवाणीवरील मासिक संवादसत्र ‘मन की बात’च्या ९१ व्या भागात देशवासीयांशी संवाद साधताना पंतप्रधानांनी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचा उल्लेख केला आणि १३ पासून १५ ऑगस्टपर्यंत घरोघरी तिरंगा फडकावून या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले. मोदींनी सुरुवातीला स्वातंत्र्य चळवळीत बलिदान देणाऱ्या योद्धय़ांना अभिवादन केले आणि ‘अमृत महोत्सव’ अभियानांतर्गत देशभरात आयोजित विविध कार्यक्रमांचा उल्लेख केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amrit mahotsav freedom people movement modi appeal photo tricolor social media ysh
First published on: 01-08-2022 at 00:01 IST