Bengaluru Stampede CM Siddaramaiah Reacts on RCB Victory Parade : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) या संघाने आयपीएल २०२५ ही स्पर्धा जिंकल्यानंतर बंगळुरुतील विधानसभा ते चिन्नास्वामी स्टेडियम अशी विजययात्रा (व्हिक्टरी परेड) काढली होती, तसेच चिन्नास्वामी स्टेडियमवर विजयोत्सव साजरा केला. मात्र हा कार्यक्रम पाहण्यासाठी, आरसीबीच्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी प्रचंड मोठी गर्दी जमली होती. या कार्यक्रमाच्या नियोजनात पोलिसांच्या ढिसाळ कारभारामुळे, बेजबाबदार नियोजनामुळे चेंगराचेंगरी होऊन ११ जणांचा बळी गेला. तसेच ४० हून अधिक लोक जखमी झाले.

या घटनेवरून विरोधी पक्ष कर्नाटक सरकारवर टीका करत आहेत. दरम्यान, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. सिद्धरामय्या म्हणाले, “४ जून रोजी विधानसभेसमोर आरसीबीच्या संघाचा जो कौतुक सोहळा पार पडला त्याचं आयोजन सरकारने केलं नव्हतं. सरकारने केवळ राज्यपाल थावरचंद गहलोत यांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं होतं”.

राज्यपाल निमंत्रणाशिवाय त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले?

कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणाले, “कर्नाटक राज्य क्रिकेट संघ (केएससीए) व आरसीबीने मिळून विधान सौदा येथील कार्यक्रम आयोजित केला होता. मला कार्यक्रमाच्या दिवशीच ११.२९ वाजता निमंत्रण मिळालं होतं जे मी स्वीकारलं. राज्याच्या मुख्य सचिवांनी देखील माझ्याशी बातचीत केली होती, त्यावर मी त्यांना पुढे जाण्यास सुचवलं. राज्यपाल देखील त्या कार्यक्रमाला आले होते. काही प्रसारमाध्यमांनी दावा केला आहे की राज्यपालांना त्या कार्यक्रमाचं निमंत्रण नव्हतं तरी देखील ते तिथे आले होते. मात्र, हे वृत्त चुकीचं आहे”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिद्धरामय्या म्हणाले, “मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव के. गोविंदराज (ज्यांना आता या पदावरून हटवलं आहे) यांनी राजभवनात फोन केला होता. तो फोन त्यांनी माझ्याकडे दिला. त्यांनी मला सांगितलं राज्यपाल देखील येत आहेत. त्यानुसार मी राज्यपालांशी बातचीत केली आणि त्यांना सांगितलं की मी देखील त्या कार्यक्रमाला जातोय, तुम्ही देखील या. मी त्यांना बोलावलं होतं. त्यामुळे राज्यपाल देखील त्या कार्यक्रमात सहभागी झाले. मात्र, पावसामुळे हा कार्यक्रम केवळ २० मिनिटे चालला. त्यामुळे आम्ही दोघे लगेच तिथून निघून गेलो. मात्र, काही वर्तमानपत्रे व वृत्तवाहिन्या दावा करत आहेत की राज्यपालांना त्या कार्यक्रमासाठी कोणी बोलावलं नव्हतं. त्यामुळे मी हे स्पष्टीकरण देतोय.