१९८४च्या शीखविरोधी दंगलीला आणि १९८९च्या भागलपूरमधील दंगलीला कॉंग्रेस तर २००२च्या गुजरातमधील दंगलीला भाजपच जबाबदार असल्याचा आरोप बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मंगळवारी केला.
या सर्व दंगली देशाच्या प्रतिमेवर डाग असून, प्रत्येक भारतीयाला त्यामुळे लाज वाटत असल्याचे मतही त्यांनी मांडले. या दंगली घडवून आणणाऱयांनी त्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असेही नितीशकुमार म्हणाले.
कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत १९८४च्या शीखविरोधी दंगलींमध्ये काही कॉंग्रेस नेत्यांचा सहभाग होता, असे म्हटले होते. दंगलींमध्ये सहभागी असणाऱयांना कायद्याने शिक्षा झाली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावर पत्रकारांनी नितीशकुमार यांना प्रतिक्रिया विचारल्यावर त्यांनी ८४ मधील दंगलींना कॉंग्रेसच जबाबदार असल्याचे सांगितले. भागलपूरमध्ये १९९० मध्ये भडकलेल्या दंगलीप्रकरणी दोषींना शिक्षा देण्याइतपत पुरावे असतानाही लालू प्रसाद यादव यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रीय जनता दलाच्या सरकारने १९९० मध्ये दंगलींची चौकशीच थांबविण्याचे आदेश दिले, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
संग्रहित लेख, दिनांक 28th Jan 2014 रोजी प्रकाशित
‘८४ आणि ८९ च्या दंगलीला कॉंग्रेस तर २००२ च्या दंगलीला भाजप जबाबदार’
१९८४च्या शीखविरोधी दंगलीला आणि १९८९च्या भागलपूरमधील दंगलीला कॉंग्रेस तर २००२च्या गुजरातमधील दंगलीला भाजपच जबाबदार असल्याचा आरोप बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मंगळवारी केला.
First published on: 28-01-2014 at 05:35 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cong responsible for 1984 1989 riots bjp for 2002 riot