काँग्रेस नेते आणि माजी खासदार उदीत राज यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासंबंधी केलेल्या विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. ‘कोणत्याही देशाला असे राष्ट्रपती मिळू नयेत’ असं वक्तव्य उदीत राज यांनी केलं आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या या विधानानंतर टीका होऊ लागली आहे. राष्ट्रीय महिला आयोगानेही त्यांच्या या वक्तव्याची दखल घेतली असून, माफी मागण्यास सांगितलं आहे. दरम्यान, उदीत राज यांनी स्पष्टीकरण देताना हे आपलं वैयक्तिक मत असल्याचं म्हटलं आहे.

उदीत राज यांनी ट्वीटमध्ये काय म्हटलं आहे?

उदीत राज यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की “कोणत्याही देशाला द्रौपदी मुर्मू यांच्यासारख्या राष्ट्रती मिळू नयेत. चमचेगिरीची पण हद्द असते. ७० टक्के लोक गुजरातचं मीठ खातात असं त्या म्हणतात. स्वत: मीठ खाऊन आयुष्य घालवलं, तरच यांना कळेल”.

State president of NCP Sharad Pawar faction Jayant Patil criticizes BJP
जयंत पाटील म्हणतात, ‘संविधान बदलण्याचा कट हा ‘त्यांच्या’ ४०० पारच्या घोषणेतून…”
kolhapur, hatkanangale, BJP, Maharashtra Kranti Sena Party, Constituent Party in mahayuti, Maharashtra Kranti Sena in mahayuti, lok sabha 2024, election 2024,
महाराष्ट्र क्रांती सेना पक्षाला घटक पक्ष म्हणून मान्यता; भाजपकडून मित्र पक्षांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न
pm modi slams congress chief mallikarjun kharge over his remark on article 370
खरगेंची मानसिकता तुकडे-तुकडे टोळीची! अनुच्छेद ३७०वरून पंतप्रधान मोदींची टीका
Rohit Pawars allegations against Eknath Khadse
रोहित पवार यांचा एकनाथ खडसे यांच्यावर आरोप, म्हणाले, ‘अटकेच्याच भितीने…’

उदीत राज यांच्या विधानानंतर भाजपाकडून जोरदार हल्लाबोल केला जात आहे. ‘ही आदिवासी विरोधी मानसिकता’ असल्याची टीका भाजपाने केली आहे.

हेही वाचा – विश्लेषण : शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात ज्यावरून संघर्ष सुरू आहे त्या धनुष्यबाणाचा इतिहास काय?

भाजपाची टीका

भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटलं आहे की “उदीत राज यांनी राष्ट्रपती मुर्मू यांच्यासाठी वापरलेले शब्द दुर्दैवी असून, चिंता वाढवणारे आहेत. अशा प्रकारच्या शब्दांचा वापर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी काँग्रेसच्या अधीर रंजन चौधरी यांनीही हे केलं आहे. यावरुन त्यांची आदिवासी विरोधी विचारसरणी समोर येते”.

एकनाथ शिंदे शिवसेना पक्षप्रमुख पदावर दावा करणार?

भाजपाच्या शेहजाद पुनावाला यांनीदेखील ट्विट केलं आहे. “अजॉय कुमार यांनी मुर्मू यांना पापी म्हटल्यानंतर आणि अधीर रंजन चौधरी यांनी त्यांचा उल्लेख ‘राष्ट्रपत्नी’ केल्यानंतर काँग्रेसची पातळी आणखी खालावली आहे. उदीत राज यांनी पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपतींबाबत आक्षेपार्ह भाषा वारली आहे. काँग्रेसला आदिवासी समाजाचा हा अपमान मान्य आहे का?” अशी विचारणा केली आहे.

उदीत राज यांचं स्पष्टीकरण

दरम्यान उदीत राज यांनी वाद वाढू लागल्यानंतर स्पष्टीकरण दिलं असून हे आपलं वैयक्तिक मत असून, पक्षाचा याच्याशी काही संबंध नसल्याचं सांगत सारवासारव केली आहे. ते म्हणाले “द्रौपदी मुर्मू यांची उमेदवारी आणि प्रचार आदिवीसांच्या नावेच करण्यात आला होता. याचा अर्थ त्या आता आदिवासी नाहीत असा होत नाही. जेव्हा अनुसूचित जाती/जमातीमधील एखादी व्यक्ती उच्च पदावर पोहोचल्यानंतर आपल्या समाजाकडे दुर्लक्ष करत मूक बनते तेव्हा मला वेदना होतात”.

महिला आयोगाचा माफी मागण्याचा आदेश

राष्ट्रीय महिला आयोगाने उदीत राज यांच्या वक्तव्याची दखल घेतली आहे. महिला आयोगाने उदीत राज यांना नोटीस पाठवली असून माफी मागण्यास सांगितलं आहे.