केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) पेपरफुटीवरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. व्यक्तीची खासगी माहिती (डेटा) लीक, आधार कार्डची माहिती लीक, सीबीएसईचे पेपर लीक होत आहेत. प्रत्येक गोष्ट लीक होत आहे. कारण या देशाचा ‘चौकीदार’च वीक असल्याची खरमरीत टीका राहुल गांधी यांनी केली आहे.
सीबीएसईचे दहावीचे गणित आणि बारावीचे अर्थशास्त्र विषयांच्या परीक्षा पुन्हा होणार आहेत. या दोन विषयांच्या प्रश्नपत्रिका व्हॉट्स अॅपवर फुटल्याने देशभरात खळबळ उडाली. शेवटी या दोन्ही विषयांच्या परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय बोर्डाला घ्यावा लागला. या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ट्विटरवरुन मोदी सरकारवर टीका केली आहे.
डेटा लीक, आधार लीक, स्टाफ सिलेक्शन कमिशनचे पेपर लीक, निवडणुतीची तारीख लीक आणि आता सीबीएसईचे पेपर लीक. प्रत्येक गोष्ट लीक होते कारण देशाचा चौकीदार वीक आहे, असे ट्विट त्यांनी केले. ‘आता फक्त एकच वर्ष’ असे म्हणतं राहुल गांधींनी २०१९ मध्ये सत्ता परिवर्तन होईल, केला आहे.
कितने लीक?
डेटा लीक !
आधार लीक !
SSC Exam लीक !
Election Date लीक !
CBSE पेपर्स लीक !हर चीज में लीक है
चौकीदार वीक है#BasEkAurSaal— Rahul Gandhi (@RahulGandhi) March 29, 2018