भारताचा जलद गोलंदाज मोहम्मद शामी सध्या विश्वचषक स्पर्धेमध्ये चांगलं प्रदर्शन करत आहे. स्पर्धेच्या पहिल्या काही सामन्यांमध्ये अंतीम ११ खेळाडूंमध्ये शामीला संधी देण्यात आली नव्हती. मात्र मागील चार सामन्यांमध्ये त्याने १४ बळी घेत या विश्वचषकामध्ये सर्वाधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातही त्याने तमीम इक्बालला माघारी पाठवले. मात्र आता शमीच्या कामगिरीवर एका माजी पाकिस्तानी खेळाडूने वादग्रस्त विधान केले आहे.
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताचा पराभव झाला. भारताचा या स्पर्धेतील पहिला पराभव होता. मात्र त्यानंतर भारताने मंगळवारी बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकत उपांत्य फेरीमध्ये जागा पक्की केली. असे असली तरी भारताचा शेजारी असणाऱ्या पाकिस्तानमध्ये अजूनही भारताच्या इंग्लंडविरुद्धच्या पराभवाचीच चर्चा सुरु आहे. याच पराभवाचे विश्लेषण करताना पाकिस्तानचे माजी खेळाडू सिकंदर बख्त यांनी शमीबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. एका वृत्तवाहिनीवर भारताच्या कामगिरीबद्दल बोलताना बख्त यांनी शमीच्या चांगल्या कामगिरीचा संबंध त्यांच्या मुस्लीम असण्याशी जोडला आहे.
काय म्हणाले बख्त
इंग्लंडने भारताचा पराभव केल्याने पाकिस्तानची उपांत्य फेरीतील वाट बिकट झाली. याच पराभावचे विश्लेषण बख्त एका वृत्तवाहिनीवरील चर्चेत करत होते. ‘भारताकडे सर्वोत्तम गोलंदाज आहेत. बुमराह तर जगातील पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. त्याने विकेट घेतली नाही तर कुलदीप यादव विकेट घेतो. चहलही भारतासाठी हुकूमी एक्का आहे. आता तर शमीनेही आपली जादू दाखवण्यास सुरुवात केली आहे. भारताकडून खेळणारा शमी मुस्लीम आहे ही चांगली गोष्ट आहे. मी भारताची गोलंदाजी पाहिली आहे. भारताचे मुख्य गोलंदाज इंग्लंविरुद्ध चालले नाहीत. यावद आणि चहलची इंग्लडच्या फलंदाजांनी धुलाई केली. त्यामुळेच इंग्लंडला ३३७ धावांपर्यंत मजल मारता आली,’ असं मत बख्त यांनी व्यक्त केलं आहे.
Don’t understand why religion has to be mentioned when looking at the performance of the Indian bowling attack #CWC19 pic.twitter.com/A3INMEEBP7
— Saj Sadiq (@Saj_PakPassion) July 1, 2019
बख्त यांच्या या वक्तव्यावरुन नेटकऱ्यांनी त्यांची चांगलीच फिरकी घेतली आहे.
पाकिस्तानी संघात तर सगळेच मुस्लीम आहेत मग…
Tumhari team me bhi to saare musalmaan hai fir kyo aisi taisi karwayi itne matches me ??
— illegal Quota IITian (@TheTalkingHead2) July 2, 2019
आमच्या संघातील सर्वजण भारतीय आहेत
mohmad shami musalman he es liye 5 wicket liyahumare team me koi hindu ya musalman nehi hota only indian hota he…. Criticism kar na alag bad aur 3rd grade soach alag bat.. Ye bat bi he crickters ho jane se koi educated nehi ho jata he?? Dimag ki ilaz jaruri
— BIPLAV (@biplavsethi5) July 1, 2019
तो मुस्लीम असण्याचा काय संबंध
Mr. Cricket expert Shami is not taking wickets coz he is Musalman but coz he has trained himself for years to do that.Indian team has only Indians but u won’t understand coz ur nation is built on the basis of religion but v hv only Indians. #INDvBAN
— Pappu Gandhi (@pappugitaly) July 1, 2019
आमच्याकडे असं नसतं
Hamari Team main jo bhi player select hote hain unki sirf ek hee Identity hai Indian No one is Hindu, Muslim , Sikh etc May be in Pakistan selector select player After watching their religion that’s the reason no player from minority playing in current Pakistani Team.
— K L RAHUL (@SirKLRahul) July 1, 2019
हसू थांबवावं लागलं
I had to stop my self from laughing ! It’s pretty evident in the clip .
— Fatima.saleem (@FatimaSaleem84) July 2, 2019
पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांची प्रतिक्रिया
He has lost his mind it all together : first he gave a statement that shahid afridi slaped amir , then he offered a unwanted or uncalled for offer to bcci . And now this statement unbelievable .
— umair malik(@iamumairmalik) July 1, 2019
बख्त यांनी पहिल्यांदाच असे वक्तव्य केलेले नाही
बख्त यांनी अशाप्रकारे वादग्रस्त वक्तव्य करण्याची पाहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी अशी विचित्र वक्तव्य केली आहेत. इंग्लंडविरुद्धच्या सामन्याआधीही त्यांनी भारत पाकिस्तानला स्पर्धेतून बाहेर काढण्यासाठी इंग्लंडविरुद्ध मुद्दाम सामना हरेल. भारताला पाकिस्तानकडून पराभव होण्याची भिती असल्याने ते पाकिस्तानला बाहेर काढण्यासाठी मुद्दाम हरतील असे मत बख्त यांनी व्यक्त केले होते. भारत इंग्लंड सामन्याच्या निकालानंतर त्यांनी मी खरं बोलत होतो असा दावाही केला. ‘भारताने ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्यावरुन त्यांना या सामन्याबद्दल गांभीर्य वाटत नव्हते’ असा आरोपही बख्त यांनी केला होता.