Rahim Yar Khan Airbase’s sole runway Non-Operational For a Week : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रहीम यार खान एअरबेसवर भारताच्या लष्करी हल्ल्यानंतर, एअरबेसवरील एकमेव धावपट्टी एका आठवड्यासाठी बंद घोषित करण्यात आली आहे, असे पाकिस्तान नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने (पीसीएए) शनिवारी संध्याकाळी जारी केलेल्या NOTAM (Notice to Airmen) मध्ये म्हटलं आहे. द इंडियन एक्सप्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. हा NOTAM शनिवारी (१० मे) पाकिस्तान वेळेनुसार दुपारी ४ वाजता (भारतीय वेळेनुसार सायंकाळी ४:३० वाजता) लागू झाला आणि १८ मे रोजी पाकिस्तान वेळेनुसार सकाळी ४:५९ वाजता (भारतीय वेळेनुसार ५:२९ वाजता) लागू राहील.

NOTAM ने म्हटले आहे की काम सुरू असल्याने ते बंद करण्यात आले आहे, तसंच विमान उड्डाणांसाठी उपलब्ध असणार नाही. याव्यतिरिक्त तपशीलांमध्ये अधिक काहीही सांगितलेले नाही. भारताने या हवाई तळावर हल्ला केल्याने त्याच्या व्यापक दुरुस्तीची आवश्यकता असल्याने हे तळ तात्पुरते बंद करण्यात आले आहे. “फ्लॅट ऑपरेशन डब्ल्यूआयपीसाठी आरडब्ल्यूवाय वापरता येत नाही”, असे नोटममध्ये म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या (ICAO) मते, NOTAM मध्ये ‘WIP’ हा कोड वापरणे म्हणजे प्रगतीपथावर असलेले काम होय. यूएस फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशन (FAA) नुसार, ‘WIP’ म्हणजे विमानतळाच्या पृष्ठभागावर होणाऱ्या कोणत्याही कामाचे वर्णन. NOTAM मध्ये एअरबेसवरील धावपट्टीचा विशेषतः उल्लेख असल्याने, ते सूचित करते की धावपट्टीवर काम सुरू आहे.

रहीम यार खान एअरबेसमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ

रहीम यार खान एअरबेसमध्ये शेख झायेद आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील आहे. फ्लाइट राडार २४ वर उपलब्ध असलेल्या विमानतळाच्या डेटानुसार, त्याची एकमेव धावपट्टी – रनवे ०१/१९ – बिटुमिनस पृष्ठभागाची आहे आणि त्याची लांबी ३,००० मीटर किंवा ९,८४३ फूट आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शनिवारी सायंकाळी दोन अणुशक्तीसंपन्न देशांमध्ये शस्त्रविरामाबाबत चर्चा झाली. याआधी चार दिवस दोन्ही देशांमध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला होता. भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांना आणि प्रमुख पाकिस्तानी लष्करी तळांवर लक्ष्य केले होते. त्यातच हा हवाई तळ होता. शनिवारी भारताने भारतीय लढाऊ विमानांमधून हवाई-प्रक्षेपित अचूक शस्त्रे वापरून रफीकी, मुरीद, चकलाला, सुक्कुर आणि जुनिया या सहा पाकिस्तानी लष्करी लक्ष्यांवर हल्ला केला. पाकिस्तानच्या वाढत्या आणि प्रक्षोभक कृतींनंतर भारताने ही प्रतिक्रिया दिली. यामध्ये अनेक ठिकाणी हवाई घुसखोरीचा प्रयत्न केला, जो भारतीय सशस्त्र दलांनी हाणून पाडला.