आजचा दिवस हा भारतासाठी मोठा दिवस आहे. भाग्यशाली दिवस आहे अशा आशयाचे एक ट्विट काँग्रेस नेते शशी थरूर यांनी केले आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आणि कल समोर येत आहेत. अशात काँग्रेस नेते शशी थरूर यांनी खोचक ट्विट करत भाजपावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. या ट्विटमध्ये मध्ये त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनाही कोट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगण आणि मिझोरम या पाच राज्यांमध्ये निवडणुका पार पडल्या. आज निकालाचा दिवस आहे. जे कल आणि निकाल समोर येत आहेत त्यावरून जनतेने भाजपाला नाकारले आहे असे दिसते आहे. मध्यप्रदेशात काँग्रेस आणि भाजपामध्ये काँटेकी टक्कर दिसते आहे. अशात शशी थरूर यांनी केलेले ट्विट सूचक आहे. राजस्थान आणि छत्तीसगढ या ठिकाणी भाजपाची सत्ता गेल्यात जमा आहे. मिझोरममध्ये MNF चा विजय झाला आहे तर तेलंगणात टीआरएस आणि एमआयएमला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. मध्य प्रदेशात भाजपा आणि काँग्रेस यांच्यात चुरशीची लढत आहे. एकंदरीत काय तर मतपेटीतून जनतेने भाजपाला नाकारल्याचे चित्र आहे. त्या अनुषंगानेच हे खोचक ट्विट शशी थरूर यांनी केले आहे.

अंधेरों का आतंक बथेरा हुआ

चलो जाग जाओ सवेरा हुआ.
नई सुबह नया जोश। #EndToJumlas #TimesUpBJP

— Shashi Tharoor (@ShashiTharoor) December 11, 2018

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Great day for india tweets shashi tharoor
First published on: 11-12-2018 at 16:43 IST