जम्मू-काश्मीरचे कलम ३७० हटवण्यात आल्याबाबत जनजागृती करण्यासाठी भाजपाकडून देशभर ‘जन जागरण अभियान’ आयोजीत करण्यात आले आहे. यासाठी गृहमंत्री अमित शाह २२ सप्टेंबर रोजी मुंबईत येणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमित शाह यांच्या या दौऱ्यादरम्यान महाराष्ट्र भाजपाकडून एका विशेष महासभेचे देखील आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आहे. भाजपाच्या या ‘जन जागरण अभियान’ चा उद्देश जनतेला कलम ३७० हटवण्याचा निर्णय मोदी सरकारने का घेतला, हे पटवून देणे असा आहे.

कलम ३७० पंतप्रधान मोदी सरकाने हटवल्यांतर सातत्याने काँग्रेसकडून टीक केली जात आहे. या मुद्यावरून काँग्रेससह विरोधी पक्षाचे नेते अनेक विधानं देखील करत आहेत. याच पार्श्वभूमीवर व महाराष्ट्रातील आगामी निवडणुका पाहता भाजपा अध्यक्ष व गृहमंत्री अमित शाह आता मैदानात उतरत असल्याचे दिसत आहे . माध्यमांच्या माहितीनुसार, भाजपाच्यावतीने ‘जन जागरण अभियान’ अंतर्गत देशभरात ३५ सभांचे आयोजन करण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Home minister amit shah to hold jan jagran abhiyaanin in mumbai msr
First published on: 19-09-2019 at 20:04 IST