पीटीआय, नवी दिल्ली : भिन्न दृष्टीकोन असण्यात गैर काय? पण, मला अशा मतभेदांना मजबूत घटनात्मक पातळीवर सामोरे जावे लागेल. विधिमंत्र्यांशी वाद घालायचा नाही, आमच्या दृष्टीकोनांमध्ये मतभेद असणे स्वाभाविक आहे, असे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड शनिवारी म्हणाले. प्रत्येक यंत्रणा परिपूर्ण नसते, मात्र आपल्याकडील न्यायवृंद यंत्रणा उत्तम आहे, असे प्रतिपादनही त्यांनी केले. न्यायपालिकेचे स्वातंत्र्य अबाधित राखायचे असेल तर बाह्य प्रभावापासून तिचे संरक्षण केले पाहिजे, असेही सरन्यायाधीश म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रत्येक पद्धत परिपूर्ण नसते, मात्र ही उपलब्ध असलेल्या पद्धतींपैकी सर्वोत्तम आहे, असे सांगून न्यायाधीशांच्या नियुक्त्यांसाठी सध्या असलेल्या न्यायवृंद पद्धतीचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी  समर्थन केले. न्यायवृंद पद्धत ही सध्या सरकार व न्यायपालिका यांच्यातील वादाचा मुद्दा ठरली आहे. न्यायपालिका स्वतंत्र राहायची असेल तर तिचे बाह्य प्रभावांपासून संरक्षण करणे आवश्यक आहे, असे सरन्यायाधीशांनी ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह’मध्ये बोलताना सांगितले.  ‘प्रत्येक पद्धत परिपूर्ण नसते, मात्र आपण विकसित केलेली ही सर्वोत्तम पद्धत आहे. मौल्यवान असलेल्या न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणे हा तिचा उद्देश होता’, असेही चंद्रचूड म्हणाले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I dont want to argue with the law minister chief justice dr dhananjay chandrachud ysh
First published on: 19-03-2023 at 00:54 IST