भारतातून चुकून एक मिसाइल सुटलं आणि ते ९ मार्च रोजी पाकिस्तानात जाऊन पडलं. या प्रकारामुळे भारताने खेद व्यक्त केला आहे. पाकिस्तानी लष्कराने याप्रकरणी काल एक पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी भारतीय मिसाईल पाकिस्तानात पडल्याने काही भागात नुकसान झाल्याचं म्हटलं होतं.


पाकिस्तानने सांगितलं, एक भारतीय मिसाईल पाकिस्तानच्या हवाई हद्दीत शिरलं आणि ते मियाँ चन्नू भागात कोसळल्याने त्या भागात थोडं नुकसान झालं आहे. याबद्दल भारतीय संरक्षण मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं आहे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या अपघातामध्ये जिवीतहानी झालेली नसल्याने ही एक दिलासादायक गोष्ट असल्याचं मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.


भारतीय संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, ९ मार्च २०२२ रोजी नेहमीच्या देखभाल प्रक्रियेदरम्यान तांत्रिक बिघाडामुळे हे मिसाईल अपघाताने प्रक्षेपित झालं. भारत सरकारने या प्रकरणाला गांभीर्याने घेतलं असून या प्रकरणाची उच्चस्तरीय न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानच्या भागात हे मिसाईल पडलं आहे. ही दुर्घटना अत्यंत खेदजनक असून या अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली ही दिलासादायक बाब आहे.