भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तत्कालीन लष्करप्रमुख सॅम माणेकशॉ यांना लिहिलेलं एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भाजपाचे खासदार आणि इंदिरा गांधींचे नातू वरुण गांधी यांनी एक्स अकाऊंटवर हे जुनं पत्र शेअर केलं आहे. २२ डिसेंबर १९७१ रोजी त्यांनी हे पत्र लिहिलं होतं. या पत्रात इंदिरा गांधींनी भारताच्या प्रादेशिक अखंडतेचं आणि राष्ट्रीय मूल्यांचं रक्षण केल्याबद्दल लष्करप्रमुखांचं अभिनंदन केलं आहे.

“लष्करप्रमुख आणि चीफ ऑफ स्टाफ समितीचे अध्यक्ष म्हणून तुमच्यावर कामाचा किती भार आहे, याची मला कल्पना आहे. तुमच्यावर सतत किती दबाव आहे, हेही मला माहीत आहे. तरीही तुम्ही तिन्ही दलांमध्ये समन्वय राखत प्रभावीपणे काम केलं आहे. तुमचं प्रभावी नेतृत्व कौशल्ये कौतुकास्पद आहे,” असं इंदिरा गांधींनी माणेकशॉ यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “इंदिरा गांधी मोठ्या नेत्या, पण तेव्हा आमच्यासाठी व्हिलन होत्या”, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधान
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Rahul Gandhi Accuses BJP and RSS of Capturing India
आपली लढाई भारतीय राज्य यंत्रणांशीही! राहुल गांधी यांच्या विधानाने वादंग; भाजप, संघाने प्रत्येक संस्था ताब्यात घेतल्याचा आरोप
Prime Minister Modi guided mahayuti MLAs on re election strategies and constituency work
पंतप्रधानांचा ‘गोपनीय’ गुरुमंत्र आमदारांकडून, ‘जाहीर’सत्तेचा गर्व न ठेवता आचरण करण्याचा मोदींचा सल्ला
rss veteran Swayamsevak Ratnakar Bhagwat passed away at the age of 95
रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक रत्नाकर भागवत यांचे निधन
Sharad pawar mocks Amit Shah And Said this About him
Sharad Pawar : शरद पवारांनी उडवली अमित शाह यांची खिल्ली! म्हणाले, “कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे….”
Sharad Pawar and Amit Shah
Sharad Pawar : शरद पवारांचं अमित शाह यांना उत्तर, “१९७८ मध्ये मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो तेव्हा हे गृहस्थ…..”
देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू ते भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष; कोण आहेत रवींद्र चव्हाण? (फोटो सौजन्य @Dev_Fadnavis)
Maharashtra Politics : देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू ते भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष; कोण आहेत रवींद्र चव्हाण?

“मला विशेषत: तुमचं सहकार्य, तुमचा स्पष्ट सल्ला आणि संपूर्ण संकटकाळात केलेली मदत यासाठी आभार मानायचे आहेत. मला सरकार आणि भारतीय नागरिकांच्या वतीने तुमच्याबद्दल आणि तुमच्या सहकारी अधिकार्‍यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला आवडेल,” असंही इंदिरा गांधींनी संबंधित पत्रात लिहिलं.

संबंधित पत्र शेअर करताना भाजपा खासदार आणि इंदिरा गांधींचे नातू वरुण गांधी यांनी लिहिलं, १९७१ च्या युद्धातील ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी तत्कालीन लष्करप्रमुख जनरल सॅम माणेकशॉ यांना लिहिलेलं पत्र आहे. खऱ्या नेत्याला माहीत असतं की संपूर्ण संघ जिंकला आहे. कधी मनाचा मोठेपणा दाखवायचा आणि कधी श्रेय घ्यायचं नाही, हे अशा नेत्याला कळतं, असं वरुण गांधींनी पोस्टमध्ये म्हटलं.

Story img Loader