पीटीआय, नवी दिल्ली

विद्यार्थ्यांनी राजकारणासाठी अभ्यासात तडजोड करू नये, असा सल्ला जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) कुलगुरू शांतीश्री पंडित यांनी दिला आहे.जेएनयूच्या परिसरात विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन करण्याच्या विरोधात कठोर उपाययोजना लागू केल्याने निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर कुलगुरू शांतीश्री धुलीपुरी पंडित यांनी हा सल्ला दिला आहे.

Arvind kejriwal
“विद्यार्थ्यांच्या हितापेक्षा राजकीय स्वार्थाला प्राधान्य”; दिल्ली उच्च न्यायालयाने अरविंद केजरीवालांना फटकारले
telangana suicides
तेलंगणात ११वी आणि १२वीचा निकाल जाहीर होताच काही तासांतच सात विद्यार्थ्यांची आत्महत्या
Prof. Rupesh Mahadik
ठाणे महाविद्यालयाचे प्राध्यापक रुपेश महाडीक यांचा आदर्श अध्यापक पुरस्काराने सन्मान
Pune University Cancels Professor s Guideship for Demanding Bribe
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ‘त्या’ लाचखोर प्राध्यापिकेवर कारवाई

पंडित म्हणाल्या की, शिस्तभंगाची कारवाई विद्यार्थ्यांना भविष्यात नोकरी मिळवण्याच्या संधींवर विपरित परिणाम करू शकते. विरोध करू नका, असे कोणीही असे म्हणत नाही. परंतु तुमच्या अभ्यासात तडजोड केली जाऊ नये हे देखील लक्षात ठेवा. विद्यार्थ्यांनी आपल्या स्वातंत्र्याचा जबाबदारीने वापर करावा, असा सल्लाही त्यांनी दिला.