इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक काल (१९ डिसेंबर) दिल्लीत पार पडली. मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. जागा वाटप आणि पंतप्रधान पदाचा चेहरा या दोन मुद्द्यांवर ही बैठक झाल्याचं सांगण्यात येतंय. तसंच, पंतप्रधान पदासाठी मल्लिकार्जुन खरगे यांच्याही नावाचा प्रस्ताव समोर आला आहे. दरम्यान, याबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. ते आज दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, इंडिया आघाडीची पाटणा, मुंबई आणि बंगलोर येथे बैठक झाली. दिल्लीत काल जी बैठक झाली तिथे समन्वयक, पंतप्रधान या विषयावर खुलेपणाने चर्चा झाली. बहुसंख्य पक्षांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावावर चर्चा घडवली. ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली. काल उद्धव ठाकरे दिल्लीत होते. त्यांनी महत्त्वाच्या भेटीगाठी घेतल्या.. अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी यांच्यासह बैठक घेतली. इंडिया आघाडीच्या बैठकीआधीही उद्धव ठाकरेंनी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन चर्चा केली. मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाचा प्रस्ताव आला. काँग्रेस पक्ष हा एक वेगळ्या पद्धतीने काम करणारा पक्ष आहे. त्या पक्षात चर्चा होईल, मग निर्णय होईल.

thane, Jitendra Awhad, mumbai High Court, quash the FIR
गुन्हा रद्द करण्यासाठी जितेंद्र आव्हाड उच्च न्यायालयात
misa bharti attacks pm modi
“…तर पंतप्रधान मोदींसह भाजपा नेत्यांना तुरुंगात टाकू”; मीसा भारती यांचे विधान, भाजपानेही दिलं प्रत्युत्तर; म्हणाले…
PM Narendra Modi Arun Varnekar
मोदींना पंतप्रधान करण्यासाठी स्वतःचे बोट छाटून देवीला केले अर्पण; कार्यकर्त्याचा अघोरी प्रकार
What Kangana Said?
कंगना म्हणाली, “सुभाषचंद्र बोस देशाचे पहिले पंतप्रधान होते, त्यांना..”; व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले…

हेही वाचा >> निलंबित खासदारांसाठी लोकसभा सचिवालयानं काढलं परिपत्रक; केल्या ‘या’ सूचना!

मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाला उद्धव ठाकरेंचा विरोध आहे का? असं विचारलं असता संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरेंनी मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाला विरोध केलेला नाही. काही प्रक्रिया पूर्ण करायच्या असतात, त्यामुळे त्यांच्या नावाची घोषणा अद्याप झालेली नाही.

राहुल गांधींना पंतप्रधानपदासाठी विरोध होत असल्याने मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावाची चर्चा असल्याचं सांगण्यात येतंय. त्यावर संजय राऊत म्हणाले, राहुल गांधींना सत्तेवर येण्याची इच्छा नसून राहुल गांधी हे इंडिया आघाडीचा प्रमुख चेहरा आहेत. ते त्यांच्या संघटनाबांधणीवर लक्ष देत आहे, काँग्रेसच्या बांधणीवर लक्ष देत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की, अत्यंत विचारपूर्वक आणि सगळ्यांशी चर्चा करून कालचे प्रस्ताव आले आहेत. जेव्हा प्रस्ताव येतो, ३० पक्ष एकत्र असतात तेव्हा निर्णय यायला वेळ लागतो.