सरकारला शेतकऱ्यांपुढे झुकायला लावल्याशिवाय राहणार नाही व आम्ही या प्रश्नावर निर्णायक लढा देऊ असे काल शेतक-यांशी चर्चा करताना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले होते. त्यानंतर आता मोदी सरकारने आणलेल्या भूसंपादन विधेयकाला देशभरातून विरोध होताना दिसत आहे. त्यानंतर आता याविरुद्ध सोशल मिडियातून जनतेने देखील आवाज उठवला असून #KisaanVirodhiNarendraModi असा टॅग पहिल्या क्रमांकावर ट्विटरवर ट्रेण्ड करत आहे. इतकेच नाही तर ” ब्रेकिंग न्यूज नरेंद्र मोदी पुन्हा भारत भेटीवर आले असून पंतप्रधान झाल्यापासून गेल्या दहा महिन्यातील ही त्यांची सहावी भारत भेट आहे ” असा संदेश व्हॉट्स अॅपवर फिरत आहे.
भूमिअधिग्रहणाच्या प्रश्नावर काँग्रेसने रामलीला मैदानावर शेतकरी मेळाव्याचे आज आयोजन केले असून, त्यात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भाषणे होतील. हा मेळावा काँग्रेसचे शक्तिप्रदर्शन मानला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kisaanvirodhinarendramodi tag trending on social media
First published on: 19-04-2015 at 11:31 IST