करोना विषाणूच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून सुरु होणाऱ्या २०२१ च्या जनणगणनेचा पहिला टप्पा तसेच राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवहीचे (एनपीआर) अद्यावतीकरणही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. केंद्रीय गृहखात्याने याची माहिती दिली आहे. In view of #COVID19 outbreak, the first phase of Census 2021 and the updation of National Population Register (NPR) postponed until further orders: Ministry of Home Affairs pic.twitter.com/Gv9ZZhf1KR — ANI (@ANI) March 25, 2020 देशभरात १ एप्रिल २०१९ पासून जणगणना (२०२१) ची प्रक्रिया सुरु होऊन ३० सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. मात्र, आता यातील पहिला टप्पा पुढे ढकलण्यात आला आहे. या प्रक्रियेदरम्यना जनतेला विवध प्रकारचे ३१ प्रश्न विचारण्यात येणार आहेत. रजिस्ट्रार जनरल अथवा जणगणना आयुक्तांची याची अधिसूचना काढली होती. दरम्यान, देशात २०२१ मधील सार्वत्रिक जनगणनेसाठी मोबाइल ॲपचा वापर केला जाईल, असं अमित शाह यांनी जाहीर केलं आहे. कागदाचा वापर सोडून आता डिजिटल जनगणनेकडे जाण्याची वेळ आली आहे, असं दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात बोलताना अमित शाह म्हणाले. म्हणजेच देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच मोबाइल अॅप्लिकेशनद्वारे जनगणना केली जाणार आहे.