बिहारमध्ये नितीश कुमार यांनी नवव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाबरोबरची महाआघाडी तोडून पुन्हा एकदा भाजपाशी घरोबा केला आहे. नितीश कुमार हे सातत्याने आपली भूमिका बदलत असल्याने त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. नितीश कुमार यांनी महाआघाडी तोडल्यापासून राजदचे नेते आणि माजी मुख्यमंत्री तेजस्वी यादव हे नितीश कुमार यांच्यावर सातत्याने हल्लाबोल करत आहेत. दरम्यान, तेजस्वी यादव यांनी दावा केला आहे की, “आम्ही सत्तेत आल्यापासून राज्याचा विकास केला. एका थकलेल्या मुख्यमंत्र्याला आम्ही राज्यात विकासकामं करायला लावली.” तेजस्वी यादव यांच्या या टीकेला नितीश कुमार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

नितीश कुमार यांनी काही वेळापूर्वी पाटणा येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, तेजस्वी यादव केवळ फालतू बाता मारतायत. त्यांनी राज्यातल्या किती लोकांना रोजगार दिला? राज्यातील शिक्षणव्यवस्थेसाठी काय केलं? राज्यात जेव्हा त्यांचं सरकार होतं, तेव्हा भीषण परिस्थिती होती. राज्यातले लोक संध्याकाळ झाली की घराबाहेर पडत नव्हते. राज्याची काय स्थिती होती हे सर्वांना माहिती आहे. आम्ही सत्तेत आल्यावर राज्याचा विकास केला. मोठमोठ्या इमारती बांधल्या. तेजस्वी आत्ता बच्चे आहेत, ते आत्ता राजकारणात आले आहेत. त्यांना काहीच माहिती नाही.

jammu Kashmir polls
विश्लेषण: निष्ठावंतांची नाराजी भाजपला जम्मू व काश्मीरमध्ये भोवणार? नव्या चेहऱ्यांना संधी?
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
shivsena thackaray
“पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतात, ती वास्तू…”; शिवरायांचा पुतळा कोसळण्यावरून ठाकरे गटाचं टीकास्र; मुख्यमंत्र्यांनाही केलं लक्ष्य!
Ajit Pawar in trouble again due to controversial statement
वादग्रस्त विधानाने अजित पवार पुन्हा अडचणीत
hunger strike for Vidarbha, politics Vidarbha,
नेते राजकारणात व्यग्र, विदर्भ राज्यासाठी उपोषणकर्ती रुग्णालयात
Chief Justice Dhananjay Chandrachud asserted that the importance of independence was highlighted because of Bangladesh
बांगलादेशमुळे स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित; सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे प्रतिपादन
Ajit Pawar, Ladki bahin yojna, Ravi Rana,
काही ‘महाभाग’ योजनेचे पैसे परत घेण्याचे वक्तव्य करतात, अजित पवारांची आमदार रवी राणांवर टीका
Deputy CM Ajit Pawar, Ajit Pawar Inaugurates Sinhagad Road Bridge, Sinhagad Road Bridge, Ajit Pawar, Majhi Ladki Bahin Yojana, women empowerment, Medha Kulkarni,
बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले… असं आमचं सरकार – अजित पवार

नितीश कुमार म्हणाले, २००५ पासून राज्यात खऱ्या अर्थाने विकासाला सुरुवात झाली. आम्ही वैद्यकीय क्षेत्रात लक्ष घातलं. लोकांना उपचारांसाठी पैसे दिले. राज्यात रस्ते नव्हते, आम्ही राज्यभर रस्ते बांधले. लोकांच्या घरापर्यंत रस्ते बांधून दिले. ते (लालू प्रसाद यादव) केंद्रात मंत्री होते, राज्यातही त्यांची सत्ता होती. तरी त्यांनी राज्यात काहीच काम केलं नव्हतं. आता राज्यातल्या जनतेला पायी प्रवास करावा लागत नाही. पूर्वी रस्ते नव्हते आणि सार्वजनिक वाहतूक प्रणालीदेखील नव्हती.

हे ही वाचा >> “मनोज जरांगे पाटील यांच्यात हिमंत असेल तर..”, छगन भुजबळ यांचा थेट इशारा

काय म्हणाले होते तेजस्वी यादव?

तेजस्वी यादव म्हणाले होते, आम्ही खूप अपेक्षांसह सरकार स्थापन केलं होतं. ज्या उद्देशाने आम्ही सरकार बनवलं ती उद्दीष्टे नितीश कुमार यांनी त्यावेळी सांगितली होती. ते आता भाजपाबरोबर गेले आहेत. त्यांनी लोकशाहीची हत्या केली आहे. त्यामुळे त्यांना राज्यातली जनताच उत्तर देईल. त्यांनी किंवा इतर कोणीही आता केवळ कामाच्या गोष्टी केल्या पाहिजेत. कामं आणि राज्याच्या विकासावर बोललं पाहिजे. कोण काय बोलतंय, काय बोलत नाही यावर चर्चा करण्याला काहीच अर्थ नाही. जे झालं तो आता इतिहास आहे. आम्ही पुढचा विचार करत आहोत. आम्ही जो विचार डोळ्यासमोर ठेवून सरकार बनवलं होतं, आमचं जे व्हिजन होतं ते नक्कीच पूर्ण करू. खेळ अजून बाकी आहे, आम्ही मिळून जनतेची स्वप्नं पूर्ण करू.