Rajnath Singh Pakistan Begger Remark: सशस्त्र दलांच्या सुरक्षा आणि लढाऊ तयारीचा आढावा घेण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गुरुवारी जम्मू आणि काश्मीरमध्ये होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्ड्यांवर ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केल्यानंतर संरक्षणमंत्र्यांचा हा जम्मू आणि काश्मीरचा पहिलाच दौरा होता.
यावेळी श्रीनगरच्या बदामी बाग छावणीत राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला चांगलेच फटकारले आहे. पाकिस्तानच्या आर्थिक परिस्थितीवर कडक टीका करताना, राजनाथ सिंह यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून वारंवार घेतलेल्या कर्जाचीही खिल्ली उडवली.
…तिथूनच भिकाऱ्यांची रांग सुरू होते
राजनाथ सिंह म्हणाले की, “पाकिस्तानबद्दल, मी तुम्हाला काय सांगू? भीक मागण्याच्या अज्ञानामुळे तो देश अशा स्थितीत पोहोचला आहे की, पाकिस्तान जिथे उभा राहतो, तिथूनच भिकाऱ्यांची रांग सुरू होते.”
“तुम्ही ऐकले असेलच की, ते पुन्हा एकदा कर्ज मागण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे गेले. दुसरीकडे, आज आपला देश अशा देशांच्या श्रेणीत येतो जो आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडेला कर्ज देतो, जेणेकरून ते गरीब देशांना कर्ज देऊ शकेल,” असे सिंह म्हणाले.
राजनाथ सिंह यांनी बदामी बाग छावणीत सांगितले की, “अशा प्रतिकूल परिस्थितीत तुमच्याशी भेटून मला अभिमान वाटत आहे. पंतप्रधानांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली ऑपरेशन सिंदूर दरम्यान तुम्ही सर्वांनी जे काही केले त्याचा संपूर्ण देशाला अभिमान आहे.”
ते पुढे म्हणाले की, “संपूर्ण जगाला भारताबद्दल माहिती आहे की, आपण नेहमीच शांततेला प्राधान्य दिले आहे. आपण सहसा कधीही युद्धाचे समर्थक नव्हतो परंतु जेव्हा परिस्थिती इतकी भयानक होते, जेव्हा देशाच्या सार्वभौमत्वावर हल्ला होतो तेव्हा प्रत्युत्तर देणे आवश्यक असते.”
संरक्षणमंत्र्यांनी सांगितले की, “आम्ही आपले सैन्य प्रत्येक परिस्थितीसाठी सज्ज असल्याची खात्री केली आहे. यासाठी, आपल्या सैन्याला सर्वोत्तम आणि जागतिक दर्जाची उपकरणे पुरवत आहोत. आज भारतात आधुनिक रायफल्स, क्षेपणास्त्र संरक्षण ढाल आणि ड्रोन यांसारखी अनेक नवीन पिढीची उपकरणे वेगाने तयार केली जात आहेत. याशिवाय, तुम्ही सर्वजण सीमावर्ती भागात आम्ही केलेले काम पाहत असाल. आज एलएसी आणि एलओसीवर जी कनेक्टिव्हिटी आहे ती यापूर्वी कधीही नव्हती.”