पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आज परिवर्तन यात्रेचे आयोजन केलं आहे. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सुद्धा सहभागी झाले आहे. अमित शाह यांनी या परिवर्तन यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये भाषण देताना आम्हाला सोनार बंगला घडवण्यासाठी राज्यात सत्ता हवी आहे असं म्हटलं आहे. आगामी विधानसभा निवडणूक ही आमचे बूथ कार्यकर्ते आणि तृणमूल काँग्रेसमधील लागेबांधे असणाऱ्यांमध्ये होणार आहे, असंही शाह यांनी म्हटलं आहे. ते आज २४ परगना येथील काकद्विप येथील सभेमध्ये बोलत होते. ममता बॅनर्जी यांचं सरकार पाडायचं हे आमचं ध्येय नाही. पश्चिम बंगालमधील सध्याची परिस्थिती बदलणं हे आमचं मुख्य ध्येय आहे. राज्यातील गरीब जनतेची परिस्थिती सुधरवणे, राज्यातील महिलांची परिस्थिती सुधरवणे याला आमचं प्राधान्य असणार आहे, असंही शाह यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे. It is not our aim to bring BJP govt after removing Mamata Banerjee's govt. Our goal is to ensure that there is a change in the situation in West Bengal, a change in the situation of the poor of the state, a change in situation of women of the state: Union Home Minister Amit Shah — ANI (@ANI) February 18, 2021 पुढे बोलताना हे सत्तांतर केवळ राजकीय नसेल तर गंगासागरमधील जनतेला सन्मान मिळवून देण्यासाठी असेल. या परिसरातील मासेमारी करणाऱ्यांच्या परिस्थितीमध्ये बदल करण्यासाठी असेल. राज्यात ममता बॅनर्जी यांचं सरकार असेपर्यंत येथील कायदा सुव्यवस्थेची स्थिती सुधारेल का?, ममता सत्तेत असताना बंगाल विकासाच्या मार्गावर चालेल का?, असे प्रश्नही अमित शाह यांनी आपल्या भाषणामधून उपस्थित करत सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या सरकारवर निशाणा साधला. This is not a change in power, this is about bringing respect to Gangasagar, about bringing a change in the fishermen of the region. Can law and order situation be fine in West Bengal as long as there is Mamata Banerjee's govt here? Can Bengal walk on the path to progress?: HM — ANI (@ANI) February 18, 2021 भाजपा सत्तेत आल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये आम्ही महिलांसाठी ३३ टक्क्यांहून अधिक आरक्षण देऊ असं आश्वासनही शाह यांनी दिलं. BJP govt will provide more than 33% reservation to the women in West Bengal: Union Home Minister Amit Shah, at the launch of fifth Poribortan Yatra in Kakdwip of South 24 Parganas district pic.twitter.com/VJrKmtXspb — ANI (@ANI) February 18, 2021 भाजपाने सुरु केलेल्या निवडणूक प्रचारामधील ही पाचवी परिवर्तन रॅली आहे. पश्चिम बंगालमधील निवडणुकांची लवकरच घोषणा होणार असून राज्यात भाजपा विरुद्ध ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये थेट स्पर्धा रंगणार आहे.