Raja Raghuvanshi : इंदूरचा व्यावसायिक राजा रघुवंशी याची हत्या त्याची पत्नी सोनम तिचा कथित बॉयफ्रेंड राज कुशवाहा आणि इतर तीन सुपारी किलर्सनी मिळून केली. सोनम आणि राजा यांचं लग्न ११ मे रोजी झालं होतं. त्यानंतर हे दाम्पत्य मधुचंद्रासाठी गेलं होतं. २३ मे रोजी शिलाँगहून दाम्पत्य बेपत्ता झाल्याची बातमी आली होती. मात्र २ जूनला राजाचा मृतदेह सापडला आणि सोनम बेपत्ताच होती. राजाच्या हत्येमागे सोनमच असेल का? या पैलूच्या दिशेने पोलिसांनी तपासाची चक्रं फिरवली आणि त्यांनी वर्तवलेला प्राथमिक अंदाजच खरा ठरला. कारण राजाच्या हत्येमागे सोनमचा हात आहे हेच आता समोर आलं. दरम्यान या दोघांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात एक अँकरही आहे. तो अँकर शेवटी राजाला म्हणतो राजाभाई तुम तो गये. तो हे गंमतीत म्हणाला होता पण ही गोष्ट खरी ठरली.

११ मे रोजी सोनम आणि राजाचं लग्न, २३ मे ला हत्या

२० मे रोजी सोनम आणि राजा मधुचंद्रासाठी इंदूरहून रवाना झाले. बंगळुरुमध्ये फिरल्यानंतर सोनमने राजासमोर अट ठेवली की शरीर संबंध ठेवण्यापूर्वी आपल्याला कामाख्या देवीचं दर्शन घ्यावं लागेल. राजाने ती अट मान्य केली. ज्यानंतर दोघंही २२ मे रोजी गुवाहाटी येथील कामाख्या मंदिरात गेले. तिथे त्यांनी देवीचं दर्शन घेतलं. राजाने त्या ठिकाणी फोटोही काढले. दरम्यान दुसऱ्या दिवशी म्हणजेच २३ मे रोजी हे दोघंही शिलाँग येथील इस्ट खासी हिल्स या ठिकाणी पोहचले. तिथे चेक होम स्टे मध्ये चेक इन केलं आणि ट्रेक करायला सुरुवात केली. यावेळी सोनमच्या सासूचा म्हणजेचा राजाच्या आईचा फोनही तिला आला होता. राजाला शिलाँगला घेऊन जायचं आणि तिथेच ठार करायचं हे सोनमने तिचा कथित प्रियकर राज कुशवाहा याच्यासह ठरवलं होतं. त्यानुसार तीन सुपारी किलर्स या ठिकाणी पोहचले होते. त्यांनी विशाल, आकाश, आणि आनंद या तिघांनी मिळून राजाची हत्या केली आणि त्याचा मृतदेह दरीत फेकला. सुरुवातीला सोनम आणि राजा रघुवंशी दोघंही बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली. या दोघांच्या घरातले काही सदस्यही शिलाँगला पोहचले. पण सोनम आणि राजा कुणाचाच पत्ता लागला नाही. पोलीस, एसडीआरएफ आणि स्थानिक गिर्यारोहण पथकाकडून या दोघांचा शोध सुरु होता. २ जून रोजी राजाचा मृतदेह २०० फूट खोल दरीत आढळून आला. त्यानंतरही सोनम बेपत्ता होती. राजाच्या शरीरावर वार होते त्यामुळे त्याची हत्या केली गेली आहे हे पोलिसांना वाटलं होतं पोलिसांचा तो अंदाज बरोबर ठरला. दरम्यान या दोघांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यातला अँकर काही वचनं राजाला द्यायला सांगतो, काही सोनमला. त्यात सोनमच्या उत्तरानंतर म्हणतो राजाभाई तुम तो गये. त्याचे हे शब्द खरे ठरले आहेत.

नेमकं काय घडलं?

अँकरने लग्नाच्या आधी झालेल्या छोटेखानी कार्यक्रमाचा हा व्हिडीओ आहे. त्यात अँकर राजाला वचनं द्यायला सांगतो. राजा म्हणतो होय सोनम, मी तुझ्यासाठी चहा तयार करेन, दर महिन्याला शॉपिंगला घेऊन जाईन, वर्षातून एकदा परदेशात फिरायला घेऊन जाईन. मी याचं वचन देतो. असं म्हटल्यानंतर राजा, सोनम आणि अँकर तिघंही हसू लागतात. सोनमकडे हा अँकर येतो तो तिला सांगतो आता तू राजाला वचन दे की तो मित्रांबरोबर जाऊ शकतो, तोंड काळं करु शकतो. काहीही झालं तरी कुठे होतास हे विचारणार नाही. त्यावर सोनम म्हणते मै वचन नहीं दुंगी मै तो पुछूंगी. ज्यानंतर सगळे हसू लागतात. ज्यावर हा अँकर राजाला म्हणतो, “राजाभाई तुम तो गये.”

पाहा व्हायरल व्हिडीओ

@GaurangBhardwa1 या अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडीओ पाहा. तीन मिनिटांच्या या व्हिडीओत गंमतजंमत सुरु आहे. मात्र अँकर शेवटी जे म्हणाला ते शब्द खरेच ठरले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अँकरने केलेली गंमत ठरली खरी

अँकरने गंमतीत उच्चारलेले हे शब्द लग्नाच्या १२ व्या दिवशीच खरे ठरले आहेत. कारण २३ मेच्या दिवशीच सोनमने राजाची तिच्या बॉयफ्रेंडने पाठवलेल्या गुंडांच्या मदतीने हत्या केली. २ जून रोजी राजाचा मृतदेह सापडला. तर ८ जूनच्या रात्री सोनम पोलिसांना शरण आली. पोलिसांसमोर तिने गुन्हा कबूल केला आहे. सोनम लग्नाआधी आणि लग्नानंतर तिचा बॉयफ्रेंड राजा कुशवाहा याच्याशी बोलत होती. या दोघांनीच राजाच्या हत्येचा कट आखला होता. हनिमूनसाठी हे दोघं शिलाँगला गेले खरे पण राजाच्या आयुष्याची अखेर तिथेच झाली.