India Pakistan Ceasefire : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव चांगलाच वाढला होता. मात्र आज अखेर दोन्ही देशांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये शस्त्रविरामावर एकमत झाले आहे. यादरम्यान आज भारतीय लष्कराच्या तिन्ही दलातील अधिकार्‍यांनी पत्रकार परिषद घेत पाकिस्तानकडून पसरवण्यात आलेली खोट्या माहिती खोडून काढली. यावेळी भारतीय लष्कराने पाकिस्तानातील मशि‍दींवर हल्ले केल्याचा खोटा दावा देखील सैन्याने फेटाळला आहे.

दोन्ही देशांमधील तणावाच्या काळात पाकिस्तानकडून भारतीय लष्कराच्या अनेक तळांना नुकसान झाल्याचे खोटे दावे करण्यात आले होते. कर्नल सोफिया कुरेशींची यांनी पाकिस्तानकडून खोटी माहिती पसरवण्यासाठी चालवण्यात आलेल्या मोहिमेबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. कर्नल कुरेशी म्हणाल्या की, पाकिस्ताने पहिला दावा असा केला की, त्यांच्या जीएफ१७ विमानाने आपल्या एस-४०० आणि ब्राम्होस मिसाइल बेसला नुकसान पोहचवले, जे की पूर्णपणे चुकीचे आहे. दुसरे त्यांनी अशीही खोटी माहिती दिली की, आपल्या एअर फिल्ड्ल, ज्या की सिरसा, जम्मू, पठाणकोट, भटिंडा, नलिया आणि भूज येथे आहेत, ही माहिती देखील चुकीची आहे.

पाकिस्तानकडून पसरवल्या जाणाऱ्या खोट्या माहितीनुसार, आपले अॅम्युनिशन डेम्स, जे चंदीगड आणि व्यास येथे आहेत त्यांचे देखील नुकसान झाले आहे, हे देखील पूर्णपणे चुकीचे आहे. आम्ही सकाळी देखील सांगितलं की, ही सर्व ठिकाणे पूर्णपणे सुरक्षित आहेत, असे कर्नल कुरेशी यावेळी म्हणाल्या.

यावेळी कुरेशी यांनी पाकिस्तानकडून मशि‍दींना लक्ष्य केल्याचा दावा देखील फेटाळून लावण्यात आला आहे. कर्नल कुरेशी पुढे बोलताना म्हणाल्या की, पाकिस्तानच्या एका पत्रकार परिषदेत चुकीचे आणि दिशाभूल करणारे दावे करण्यात आले. यावेळी असा आरोपही केला केला गेला की, भारतीय लष्कराने पाकिस्तानातील मशि‍दींना नुकसान पोहचवले. मी हे अगदी स्पष्ट करू इच्छिते की, भारत हा धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे आणि आमची सेना भारताच्या घटनात्मक मुल्यांची एक अत्यंत सुंदर झलक आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.