नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने नेमलेली समिती तीन वादग्रस्त शेती कायदे पूर्णपणे रद्द करण्यास अनुकूल नव्हती आणि पिकांची खरेदी विशिष्ट किमतीत करण्याचे काम राज्य सरकारांवर सोपवावे, तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा रद्द करावा अशी शिफारस तिने केली होती, असे समितीच्या तीनपैकी एका सदस्याने सोमवारी या समितीचा अहवाल जारी करताना सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समितीचा अहवाल जारी करावा असे पत्र आपण तीन वेळा सर्वोच्च न्यायालयाला लिहिले होते, मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने आपण स्वत:च तो जारी करत आहोत, असे पुणे येथील शेतकरी नेते अनिल घनवट यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. अर्थतज्ज्ञ अशोक गुलाटी आणि कृषी-अर्थतज्ज्ञ प्रमोद कुमार जोशी हे समितीचे इतर दोन सदस्य यावेळी हजर नव्हते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supreme court appointed panel was against repeal of 3 farm laws zws
First published on: 22-03-2022 at 02:00 IST