Surat Solanki Famliy Mass Suicide : सूरतच्या सिद्धेश्वर कॉम्प्लेक्समध्ये एकाच कुटुंबातल्या सात जणांनी आत्महत्या केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. सामूहिक आत्महत्यांचं प्रकरण हे समोर आल्यानंतर हे मृत्यू कसे काय झाले याचं रहस्य अद्यापही तसंच आहे. मात्र मृत्यू झाले त्याचं कारण समोर आलं आहे. मनिष सोलंकी कुटुंबाने मुलांना दुधात विष पिऊन मारलं. त्यानंतर हे देखील कळलं आहे की यातले दोन मृत्यू गळा दाबला गेल्याने झाले आहेत. सामूहिक आत्महत्या आर्थिक चणचणीतून झाल्याचं समोर आलं आहे.
सूरतच्या पालनपूर पाटिया भागात असलेल्या सिद्धेश्वर कॉम्प्लेक्स च्या सी २ टॉवरच्या फ्लॅट क्रमांक G-1 या घरात राहणारे इंटिरियर डिझायनर मनिष सोलंकी, त्यांची पत्नी रिटा, वडील कनु सोलंकी, आई शोभना सोलंकी, मुलगी काव्या,दिशा आणि मुलगा कुशल या सगळ्यांचे मृतदेह आढळून आले आहेत.
पोलिसांनी या सगळ्या मृतदेहांचं शवविच्छेदन केलं. त्यानंतर ही बाब समो आली आहे की लहान मुलं आणि आई वडिलांच्या शरीरात विष आढळलं आहे. तर मनिष सोलंकी त्यांची मोठी मुलगी आणि आई यांच्या गळ्यावर गळा दाबल्याच्याही खुणा आढळून आल्या आहेत.
सूरतच्या सरकारी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी चार तासांसाठी या मृतदेहांचं शवविच्छेदन चालू होतं. मनिष सोलंकी यांनी गळफास घेतला. तर इतर सहा मृतदेहांच्या गळ्यांवर गळा दाबल्याच्या खुणा आहे. या प्रकरणात मृत्यूचं अंतिम कारणाचा अंतिम अहवाल येणं अद्याप बाकी आहे.
इंटिरीयर डिझानयर मनिष सोलंकी यांनी आत्महत्या केली. आता असा अंदाज वर्तवला जातो आहे की मनिष सोलंकी यांनी गळफास घेण्यापूर्वी आपल्या आई वडिलांना दुधातून विष देऊन मारलं. तसंच मुलांनाही हेच दूध दिलं असावं आणि सगळ्यांचा गळाही दाबला असावा. या संदर्भातला सविस्तर अहवाल समोर आल्यानंतर मृत्यूचं कारण कळू शकणार आहे.