एकट्या दिल्ली शहरामध्येच गांधी कुटुंबियांची ६४ ठिकाणांना नावे देण्यात आलेली आहेत, असे म्हणत अभिनेते ऋषि कपूर यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ऋषि कपूर यांनी दिल्ली शहरात गांधी कुटुंबियांची नावे देण्यात आलेल्या ठिकाणांचे एक छायाचित्र ट्विट करून या स्मारकांना खरचं एखाद्याच्या कुटुंबियांची नावे देण्याची गरज आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तत्पूर्वी, देशातील महत्त्वाच्या संस्था आणि ठिकाणांना काँग्रेसने आपल्या राजवटीत नेहरू-गांधी घराण्यातील व्यक्तींची नावे दिल्यावरून ऋषि कपूर यांनी एकापाठोपाठ एक ट्विट करून जोरदार हल्ला चढवला होता. या टीकेनंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कपूर यांच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर निदर्शने करून दगडफेक केली आणि घोषणाबाजी केली गेली. आता पुन्हा ऋषि कपूर यांनी काँग्रेसवर निशाणा साधत ट्विटरवर पोस्ट केलेल्या छायाचित्राने कपूर आणि काँग्रेसमध्ये संघर्ष पेटण्याची दाट शक्यता आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: There are 64 prominent places named after them only in new delhi tweet by rishi kapoor
First published on: 20-05-2016 at 14:25 IST