पश्चिम बंगालमधील बुरद्वान जिल्ह्यात बुधवारी सकाळी झालेल्या अपघातात राज्यातील तीन पर्यटकांचा मृत्यू झाला तर १७ जण जखमी झाले. पश्चिम बंगालमध्ये फिरण्यासाठी लातूरमधून गेलेल्या पर्यटकांची बस फागूपूरमध्ये एका ट्रकला धडकून हा अपघात झाला. जवळपास गेला महिनाभर हे पर्यंटक पश्चिम बंगालमध्ये फिरत आहेत. संजय दाखण (४२), राजमती बाळशेट्टी (६५) आणि अजय अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
सर्व पर्यटक खासगी बसने गंगासागरहून लातूरच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी त्यांची बस एका मालवाहतूक करणाऱ्या ट्रकला जाऊन धडकली. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार करून सोडून देण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी बस आणि ट्रक ताब्यात घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three maharashtra pilgrims killed in wb bus crash
First published on: 15-06-2016 at 13:34 IST