त्रिपुराच्या मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधींवर टीका केली आहे. काँग्रेसच्या ऱ्हासाला राहुल गांधीच जबाबदार असल्याचं त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी म्हटलं आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर ईशान्येतील राज्यांवर बहिष्कार घातल्याचा आरोप केला आहे. ईशान्य भारतात राहुल गांधींचे अज्ञान हे पक्ष नष्ट होण्याचे प्रमुख कारण आहे, असंही ते म्हणाले.

राहुल गांधी यांनी एक ट्विट केले होते, ज्यात भारत एक संघ आहे. राहुल गांधींवर निशाणा साधत त्रिपुराचे मुख्यमंत्री म्हणाले की ते ईशान्येकडील राज्यांना विसरले आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनीही आपल्या ट्विटमध्ये ईशान्येकडील प्रदेशाचा उल्लेख न केल्याबद्दल गांधींवर टीका केली होती.

prime minister narendra modi dedicates two frontline naval warships and submarine to the nation
आत्मनिर्भरतेने भारत सागरी शक्ती ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन, दोन युद्धनौका, एका पाणबुडीचे लोकार्पण
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
leader Rahul Gandhi vs AAP supremo Arvind Kejriwal
काँग्रेस, आपच्या आरोपांनी ‘इंडिया’त विसंवाद
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
Akola Municipal Corporation Election news in marathi
अकोला महापालिकेतील ‘प्रशासक राज’ केव्हा संपणार?; संभाव्य निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी, वर्चस्व राखण्याचे भाजपपुढे आव्हान
Ramesh Bidhuri vs cm atishi marlena
Ramesh Bidhuri: ‘तिने तर बापच बदलला’, प्रियांका गांधी वाड्रा यांच्यानंतर भाजपा नेते रमेश बिधुरींचे मुख्यमंत्री आतिशींबाबत अश्लाघ्य विधान
Ramdas Athawale confirms Rahul Gandhi allegations regarding Somnath Suryavanshi Nagpur news
सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच; राहुल गांधी यांच्या आरोपाला आठवलेंकडून दुजोरा
aam aadmi party is disaster
आप नव्हे आपदा, पंतप्रधानांचे दिल्लीतील कार्यक्रमात टीकास्त्र

त्रिपुराचे मुख्यमंत्री म्हणाले, की राहुल गांधींनी त्यांचे पणजोबा आणि भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्याप्रमाणेच या प्रदेशाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, “राहुल गांधी आमच्या ईशान्येकडील सुंदर राज्यांना प्रचारासाठी विसरले आहेत. त्यांच्या पणजोबांप्रमाणे त्यांनी आमच्या प्रदेशावर बहिष्कार टाकला का? आम्ही देखील भारताचा अभिमानास्पद भाग आहोत. ईशान्येतून काँग्रेस पक्षाचा पूर्णपणे सफाया झाला आहे.”

दरम्यान, राहुल गांधींवर निशाणा साधत आसामचे मुख्यमंत्री म्हणाले की, “भारत फक्त एकसंघाच्या पलीकडे आहे.” त्याचवेळी त्यांनी राहुल गांधींना ‘राष्ट्र, राष्ट्रवाद आणि राष्ट्रीयता’शी तुम्हाला काय अडचण आहे,  असा सवाल केला आणि “भारताला बंधक बनवता येणार नाही”, असंही सरमा यांनी म्हटलं.

राहुल गांधींना ईशान्येतील राज्यांचा विसर पडला असून ते आणि त्यांचा पक्ष गुजरातपासून ते पश्चिम बंगालपर्यंत पसरला आहे, असं म्हणत होते, असा टोलाही त्यांनी लगावला.

Story img Loader