शेतमालाला हमीभाव मिळावा आणि स्वामीनाथ आयोगाच्या शिफारशी लागू केल्या जाव्यात यासाठी पंजाब आणि हरियाणामधील शेतकऱ्यांनी चलो दिल्लीचा नारा देत आंदोलन सुरू केले आहे. शेतकरी दिल्लीत पोहोचू नयेत, यासाठी सरकारनेही जय्यत तयारी केली असून शेतकऱ्यांना हरियाणा राज्यातील सीमांमध्येच अडवले आहे. यासाठी सरकारने केलेल्या तयारीवर शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. गुरूवारी शेतकरी नेते आणि केंद्रीय मंत्री यांच्यात जवळपास पाच तासांची चर्चा झाली. यावेळी शेतकरी नेते म्हणाले की, आम्हाला सरकारबरोबर संघर्ष करायचा नाही, तर शांततापूर्ण परिस्थितीत समाधान काढायचे आहे.

पंजाब आणि हरियाणामधील सीमेवर गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आणि सुरक्षा दलामध्ये संघर्ष सुरू आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि. १५ फेब्रुवारी) तीन केंद्रीय मंत्र्यांनी शेतकरी नेत्यांशी चर्चा केली. किसान मजदूर मोर्चाचे समन्वयक सरवन सिंग पंढेर यांनी बैठकीनंतर माध्यमांना माहिती देताना सांगितले की, सरकारबरोबर झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्री आपला शब्द पाळतील, अशी आम्हाला आशा आहे.

Thane Police, Thane Police Issue Notices to NCP office bearers , Jitendra awhad, Jitendra awhad Opposes Move, lok sabha 2024, thane lok sabha seat, thane news,
प्रतिबंधात्मक नोटीसांच्या मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाड यांचा ठाणे पोलिसांना इशारा
Malabar Hill, Malabar Hill Residents , made unique manifesto, Malabar Hill resident manifesto, Demand Action on Parking, Demand Action on Traffic, arvind sawant, Lok Sabha Elections, Mumbai news, malbar hill news, marathi news,
नेत्यांसाठी रस्ते बंद करू नका, मलबार हिलवासियांचा अनोखा जाहीरनामा; मुख्यमंत्र्यांवर रहिवासी नाराज
uddhav thackeray s had plan to arrest bjp leaders says eknath shinde
भाजप नेत्यांच्या अटकेचा ठाकरेंचा डाव उधळला! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
voting, Amit Shah, Mahayuti,
मतदान पूर्ण होईपर्यंत थांबायचं नाही गड्या; अमित शहा यांचा कोल्हापुरातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना सल्ला
Delhi Lieutenant Governor V K Saxena
राज्यपालांचा एक आदेश अन् महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांची हकालपट्टी! माजी अध्यक्षांवर केला गंभीर आरोप
Kirit Somaiya on Yamini Jadhav and Ravindra Vaikar
‘आता घोटाळेबाजांचा प्रचार करावा लागणार?’ किरीट सोमय्या म्हणाले, “ही तडजोड…”
Action taken by Tihar administration after Delhi Chief Minister Arvind Kejriwal  blood sugar rises
केजरीवालांना इन्सुलिन; रक्तातील साखर वाढल्यानंतर तिहार प्रशासनाकडून कार्यवाही
Rana Kapoor gets bail in latest case will be out of jail after four years
राणा कपूर यांना अखेरच्या प्रकरणातही जामीन, चार वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर पडणार

एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सरवन सिंग पंढेर म्हणाले की, सरकारने शेतकरी नेत्यांचे सोशल मीडिया अकाऊंट्स बंद केले आहेत. तसेच सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर अश्रूधूराच्या कांड्या फोडण्यात येत आहेत. त्यामुळे आम्हाला वर्तमान परिस्थितीबाबत चिंता वाटते. मंत्र्यांच्या बैठकीत आम्ही सांगितले की, आम्ही पाकिस्तानमधून आलेलो नाहीत. सरकारने आम्हाला आश्वासन दिले की, ते आमचे सोशल मीडिया अकाऊंट पुन्हा सुरू करतील.