अमेठीतून जिंकलो किंवा हरलो तरी आपण इथून कुठेही जाणार नसल्याचे आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास यांनी म्हटले आहे. कुमार विश्वास आपच्या तिकीटावर अमेठीतून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांची टक्कर कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यांच्याशी आहे.
निवडणुकीचा निकाल काहीही लागू दे, अमेठीतील गुंडगिरीविरूद्ध लढा देण्याचे माझे काम सुरूच राहिल, असे कुमार विश्वास यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी अमेठीतून आपणच निवडून येणार अशी आशा व्यक्त करणाऱया कुमार विश्वास यांनी आता निकाल काहीही लागला तरी आपण अमेठीतील लोकांचे मन जिंकले असल्याचेही म्हटले आहे. या मतदारसंघातून १७ हजार ५०० लोक आपचे सदस्य झाल्याचेही त्यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 13th May 2014 रोजी प्रकाशित
निकाल काहीही लागू देत अमेठीकरांची मने जिंकण्यात यशस्वी – कुमार विश्वास
अमेठीतून निवडून आलो किंवा नाही आलो तरी आपण इथून कुठेही जाणार नसल्याचे आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास यांनी म्हटले आहे.

First published on: 13-05-2014 at 04:39 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will not leave amethi kumar vishwas