How Net Run Rate is Calculated ICC World Cup 2023 Pakistan: आयसीसी विश्वचषक स्पर्धेमध्ये पाकिस्तानने सलग चार पराभवानंतर बांगलादेशला मात देत पुन्हा पाकिस्तानी क्रिकेट प्रेमींच्या आशा पल्लवित केल्या आहेत. आयसीसी विश्वचषकात सलग चार पराभवांचा नकोसा विक्रम केलेल्या पाकिस्तानला अपयशी होऊनही उपांत्य फेरी गाठण्याची संधी मिळू शकते. ही संधी देऊ करणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे नेट रन रेट. मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये टी २० विश्वचषकाच्या वेळी सुद्धा या नेट रन रेटच्या बळावर पाकिस्तान स्पर्धेत टिकून राहणार की बाहेर जाणार हे ठरण्याची स्थिती उद्भवली होती. पण नेहमी पाकिस्तानच्या मदतीला धावून येणारा हा नेट रन रेट नेमका काय प्रकार आहे हे आज आपण नीट सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत.

नेट रन रेट म्हणजे काय?

नेट रन रेट (NRR) म्हणजेच पॉईंट टेबलमध्ये तुम्हाला उजवीकडे दिसणारे आकडे. काही संघांच्या रांगेत हे आकडे उणे असतात तर काहींच्या रांगेत अधिक असतात. संघाच्या निव्वळ धावगतीचा दर म्हणजेच नेट रन रेट हा संपूर्ण स्पर्धेचा विचार करुन ठरवला जातो. एखाद्या संघाने संपूर्ण स्पर्धेत प्रत्येक षटकामध्ये केलेल्या सरासरी धावांमधून त्या संघाविरुद्ध प्रति षटक सरासरी किती धावा करण्यात आल्या हे वजा करून नेट रन रेट काढला जातो.

नेट रन रेट कोणत्या सामन्यांसाठी लागू होतो?

एखाद्या सामन्यामध्ये सर्व षटकं न खेळताच पूर्ण संघ तंबूत परला तर अशा स्थितीमध्ये नेट रन रेट हे संपूर्ण षटकांचा विचार करुन मोजला जातो. म्हणजेच २० षटकांच्या सामन्यामध्ये एखादा संघ १५ षटकांमध्येच बाद झाला तरी नेट रन रेट मोजताना संपूर्ण २० षटकं मोजली जातात.

एक महत्त्वाची बाब म्हणजे ज्या सामन्यांचा पूर्ण निकाल लागतो त्याच सामन्यांचा नेट रन रेट मोजला जातो. ज्या सामन्यांचा निकाल लागत नाही म्हणजेच जे अनिर्णित राहतात त्यांचा विचार नेट रनरेटमध्ये केला जात नाही. गुण वाटून दिले तरी त्याचा फरक नेट रन रेटवर पडत नाही.

नेट रन रेट कसा मोजला जातो?

नेट रन रेट मोजण्यासाठी वापरला जाणारा फॉर्म्युला (एकूण धावा ÷ एकूण षटकांचा सामना) – (एकूण किती धावा दिल्या ÷ टाकलेली एकूण षटके )

उदाहरणार्थ: जर भारताने पाकिस्तान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांमध्ये प्रत्येक सामन्यात ५० षटकांत २०० , ३०० , ४००धावा केल्या. त्यानंतर धावांची बेरीज (२००+३००+४००=९००) एकूण षटकांच्या संख्येने (१५० ) भागली जाईल. त्यामुळे येथे भारताच्या प्रति षटकात सरासरी धावा ६ आहेत.

आता, भारताने दिलेल्या प्रति षटक सरासरी धावांची गणना करू. समजा, भारताने या तीन सामन्यांमध्ये 150, 250, 350 धावा दिल्या, जिथे 50 षटके टाकली, तर दिलेल्या धावांची बेरीज (१५० + २५० + ३५० =७५० ) १५० षटकांनी भागली जाईल. उत्तर आहे ५.

हे ही वाचा<< पाकिस्तानी खेळाडूंना ‘IPL’ मुळेच फटका? पाकिस्तान क्रिकेट संघाच्या संचालकांचा आरोप, म्हणाले, “गैरसोय ही..”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता, NRR ची गणना करण्यासाठी, तुम्ही ६ मधून ५ वजा करा आणि तुम्हाला १ मिळेल. म्हणजेच भारताचा NRR असणार आहे १.