Indian Rupees Coin Facts: नोटा आणि नाणी भारतीय चलनात चालतात. तुम्ही पाहिले असेलच की ५ रुपयांच्या नाण्याचे अनेक प्रकार आहेत. जुने एक जाड नाणे आहे आणि नंतर आलेले एक पातळ सोनेरी रंगाचे नाणे आहे. पूर्वी ५ रुपयांचे जुने जाड नाणे येणे बंद झाल्याचे तुमच्या लक्षात आले असेल. सोप्या भाषेत सांगायचे तर, गेल्या अनेक वर्षांपासून जुनी ५ रुपयांची नाणी बनणे बंद झाले आहे. बाजारात शिल्लक असलेली नाणीच सुरू आहेत. पण, हे का केले गेले हे तुम्हाला माहीत आहे का? ही नाणी बंद करून नवीन प्रकारची नाणी का बनवली गेली? खरंतर यामागे एक मोठं कारण होतं. चला जाणून घेऊया त्यामागचे कारण काय होते…

नाण्यांपासून ब्लेड बनवले जात होते..

वास्तविक, ५ रुपयांची जुनी नाणी खूप जाड होती, त्यामुळे ही नाणी बनवण्यासाठी अधिक धातूचा वापर करण्यात आला. ज्या धातूपासून ही नाणी बनवली गेली, त्याच धातूपासून रेझर ब्लेडही बनवले गेले. ही बाब काही लोकांना कळताच त्यांनी त्याचा चुकीचा फायदा घेण्यास सुरुवात केली.

एका नाण्यापासून अनेक ब्लेड बनवले गेले..

धातू जास्त असल्याने चुकीच्या मार्गाने या नाण्यांची बांगलादेशात तस्करी सुरू झाली. वास्तविक, ही नाणी वितळल्यानंतर त्यांच्या धातूपासून ब्लेड बनवले गेले. एका नाण्यापासून ७ ब्लेड बनवले गेले आणि एक ब्लेड २ रुपयांना विकले गेले. अशा प्रकारे ५ रुपयांचे नाणे वितळवून त्याचे ब्लेड बनवून १२ रुपयांना विकले गेले. त्यामुळे तेथील लोकांना खूप फायदा झाला.

( हे ही वाचा: भारतातील ‘या’ शहरात आहे जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म; नावं वाचून तुम्हीही थक्क व्हाल)

त्याचे धातूचे मूल्य जास्त होते..

कोणत्याही नाण्याचे मूल्य दोन प्रकारे असते. पहिले म्हणजे पृष्ठभागाचे मूल्य आणि दुसरे म्हणजे धातूचे मूल्य. नाण्यावर जे लिहिले आहे ते पृष्ठभाग मूल्य आहे. उदाहरणार्थ,५ च्या नाण्यावर ५ लिहिलेले असते आणि धातूचे मूल्य हे ते बनवण्यासाठी वापरलेल्या धातूची किंमत असते. अशाप्रकारे, ५ चे जुने नाणे वितळताना, त्याचे धातूचे मूल्य पृष्ठभागाच्या मूल्यापेक्षा जास्त होते. त्याचा फायदा घेऊन त्यातून ब्लेड तयार केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या प्रकरणाचा छडा लागताच हे पाऊल उचलण्यात आले..

जेव्हा बाजारात नाणी कमी होऊ लागली आणि सरकारला याची माहिती मिळाली तेव्हा भारतीय रिझर्व्ह बँकेने ५ रुपयांची नाणी पूर्वीपेक्षा पातळ केली आणि ती बनवताना वापरण्यात येणारी धातूही बदलले, जेणेकरून बांगलादेशी त्यांच्यापासून ब्लेड बनवू नयेत.