West Bengal Lok Sabha Result 2024 : माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण आता नव्या इनिंगसाठी सज्ज झाला आहे. एकेकाळी कोलकाता नाईट राईडर्स या आयपीएल टीममध्ये खेळणाऱ्या युसूफ पठाणने आता पश्चिम बंगालमधून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर युसूफ पठाणने बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. या मतदारसंघात पाच वेळा खासदार म्हणून निवडून गेलेले आणि काँग्रेसचे सभागृह नेते असलेल्या अधीर रंजन चौधरी यांना युसूफ पठाणने कडवी टक्कर दिली आहे. युसूफ पठाणने जवळपास ७० हजारांची आघाडी घेतली आहे.
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचं पानिपत
पश्चिम बंगालमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. २०१९ साली भाजपाने राज्यात १८ जागा जिंकल्या होत्या. मात्र यावेळी त्यांना जोरदार फटका बसला आहे. भाजपाने यावेळी केवळ १२ जागांवर आघाडी मिळवली आहे. तर तृणमूल काँग्रेसने २९ आणि काँग्रेसने १ जागेवर आघाडी मिळवली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी फारकत घेत इंडिया आघाडीत न राहण्याचा निर्णय घेतला होता. तरीही त्यांना चांगले यश मिळताना दिसत आहे.
अमरावतीत भाजपाला मोठा धक्का; नवनीत राणांचा पराभव
भारतासाठी २००७ ते २०१२ या कालावधीत ५७ एकदिवसीय आणि २२ टी-२० सामने खेळलेला युसूफ पठाण क्रिकेटच्या मैदानावर त्याच्या तडाखेबंद फलंदाजीसाठी ओळखला जात होता. टीम इंडियासाठी एकदिवसीय सामन्यात युसूफने २ शतके आणि ३ अर्धशतकांसह ८१० धावा केल्या. या फॉरमॅटमध्ये गोलंदाजी करताना युसूफ पठाणने एकूण ३३ विकेट घेतल्या आहेत. याशिवाय टी-२० फॉरमॅटमध्ये त्याने २३६ धावा केल्या आहेत आणि १३ विकेट्सही मिळवल्या आहेत. टीम इंडिया व्यतिरिक्त युसूफ विविध आयपीएल संघांसाठी एकूण १७४ सामने खेळला आहे.
भाजपाने संदेशखालीचे प्रकरण तापवले. तृणमूल काँग्रेस महिलांविरोधी असल्याचे चित्र भाजपाने निर्माण केले होते. मात्र याचा जास्त फायदा भाजपाला मिळू शकला नाही.
मुंबई उत्तर मध्यमधून वर्षा गायकवाड विजयी, साडेचार हजारांच्या फरकाने निकमांचा पराभव
नेमके प्रकरण काय?
बांगलादेश सीमेवरील या गावात शहाजान शेखचा प्रभाव आहे. कौटुंबिक तंटे सोडवण्यात त्याचा पुढाकार असतो. विविध निर्णयात त्याचा शब्द अंतिम असतो असे गावकरी सांगतात. संदेशखाली १ व २ अशा दोन्ही पंचायती बिनविरोध झाल्या. याखेरीज बशीरहट लोकसभा मतदारसंघात तृणमूलचा खासदार आहे. त्या विजयातही शेखचा वाटा आहे. हा भाग त्या लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे पक्षासाठी तो किती महत्त्वाचा आहे हे लक्षात येते. ५ जानेवारीला संदेशखाली येथील घटना उजेडात आली. रेशन घोटाळाप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाचे अधिकारी छापा टाकण्यासाठी शेखच्या घरी आले असता, त्यांच्यावर जमावाने हल्ला केला. याच दरम्यान समाजमाध्यमावर एका महिलेची चित्रफीत आली. त्यामध्ये महिलांवर अत्याचाराचा आरोप करण्यात आला आहे. ७ फेब्रुवारी रोजी महिलांनी संदेशखाली पोलीस ठाण्याला घेराव घातला. शेखला अटक करण्याची मागणी त्यांनी केली. त्यानंतर या प्रकरणावरून भाजपने रान पेटवलेय. न्यायालयानेही कडक ताशेरे ओढलेत. यामुळे कारवाईसाठी राज्य सरकारवर चौफेर दबाव आहे.