मन्सूर खान दिग्दर्शित ‘जो जीता वही सिकंदर’ चित्रपट ३० वर्षांचा झाला आहे. या चित्रपटाच्या स्टारकास्टमधील दोन सदस्य देवेन भोजानी आणि पूजा बेदी यांनी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेता आमीर खानसोबतचा अनुभव सांगितला आहे. प्रेम, मैत्री, शत्रुत्व, खिलाडूवृत्ती आणि वर्गविभागणी या संकल्पनांची सांगड घालणाऱ्या काही हिंदी चित्रपटांपैकी एक असणाऱ्या जो जीता वही सिकंदर या चित्रपटाला तीस वर्षे झाली आहेत आणि तरीही शेवटपर्यंत प्रेरणा देणारी, स्पर्श करणारी आणि तुमच्यासोबत राहणारी ही कथा आहे.

दिग्दर्शक मन्सूर खान यांनी यापूर्वी ‘जो जीता वही सिकंदर’ला ‘नशिबवान चित्रपट’ म्हटले होते. या चित्रपटात सुरुवातीला अक्षय कुमार आमिर खान आणि नगमासोबत दिसणार होते, पण नियतीच्या मनात दुसरेच काही होते. चित्रपटासाठी नकार दिल्याबद्दल बोलताना, अक्षयने आधी एका मुलाखतीत मिड-डेला सांगितले होते की, “दीपक तिजोरीच्या भूमिकेसाठी माझी स्क्रीन टेस्ट दिली आणि त्यांना ते आवडले नाही. वरवर पाहता, मी बकवास होतो, म्हणून त्यांनी मला काढून टाकले.”

२२ मे १९९३ रोजी मन्सूर खान यांचा हा चित्रपट प्रदर्शित झाला. १९९२ मध्ये कयामत से कयामत तक या चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या मन्सूर खान यांना नेहमीच जो जीता वही सिकंदर हा चित्रपट आधी बनवायचा होता. मुंबई चित्रपट महोत्सवात (२०१६), त्यांनी चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्रा आणि राजीव मसंद यांच्यासोबत चित्रपट कसा निघाला ते सांगितले. संजूचे पात्र लिहिण्याची प्रेरणा त्यांना स्वतःच्या जीवनातून कशी मिळाली हे सांगून त्यांनी सुरुवात केली. आमिर खानने साकारलेली ही आत्मचरित्रात्मक भूमिका होती.

जो जीता वही सिकंदरचे चित्रीकरण सुरू होण्याआधी त्याला इतका वेळ का लागला हेही त्यांनी उघड केले होते. “मला ते लिहिता आले नाही. कारण मला असा विषय कसा लिहायचा हे माहित नव्हते आणि मी खरच चित्रपटसृष्टीही नव्हतो. त्यामुळे प्रेक्षकांसमोर काय चालते आणि काय नाही याबद्दल मला फारशी माहिती नव्हती, पण मला काय हवे आहे हे मला माहीत होते. त्यावेळेस मी काय लिहिले होते ते पाहिले तर ती पूर्णपणे वेगळी स्क्रिप्ट होती. वडिलांचे कोणतेही पात्र नव्हते. दोन भाऊ जिथे मोठा भाऊ जवळजवळ वडिलांसारखा होता, म्हणून मी वेगवेगळ्या नातेसंबंधांचा शोध घेत होतो. ते खूप विक्षिप्त क्षेत्र होते. माझे वडील (नासिर खान) मला म्हणाले, तू तुझ्या स्क्रिप्टवर काम करत आहेस, मग तू माझ्यावर काम का करत नाहीस, मला आमिरला लॉन्च करायचे आहे. खरं तर जो जीतासाठीही माझ्या मनात आमिर होता, पण तो नशीबवान आहे की मी तो पहिल्यांदा बनवला नाही. कयामत से कयामत तकने मला कुठे जायचे आहे याची खरी जाणीव करून दिली आणि तो अनुभव मी इथे वापरला.”

मन्सूर यांचे सहाय्यक दिग्दर्शक, जो जीता वही सिकंदरमध्ये घनश्याम किंवा घनसूची भूमिका करणारे अभिनेता देवेन भोजानी यांनी या चित्रपटाला आयुष्य बदलणारी घटना म्हटले आहे. इंडियन एक्सप्रेसशी बोलताना, देवेन यांनी आपले अनुभव शेअर केले आहेत. “आम्ही सर्वजण नुकतेच कॉलेजमधून बाहेर पडलो होतो, आणि जेव्हा आम्ही जो जीता वही सिकंदरसाठी शूटिंग केले तेव्हा तो वेळ सुट्टीसारखा होता. आमिर (खान) आणि मी एकाच कॉलेजमध्ये होतो आणि मी गुजराती थिएटर केले होते, त्यामुळे आमिर मला तेव्हापासून ओळखत होता. त्यांनी काफिला आणि मालगुडी डेजमधील माझे काम पाहिले आणि त्यांना आवडले होते, म्हणून मला जो जीता वही सिकंदरचा एक भाग होता आले. या चित्रपटाने एक प्रकारे माझे आयुष्यच बदलून टाकले. मी या चित्रपटात फक्त घनशूची भूमिका केली नाही तर मी मन्सूर खान यांचा सहाय्यक दिग्दर्शक देखील होतो. तिथूनच अभिनेता आणि चित्रपट निर्माता म्हणून माझा प्रवास सुरू झाला. लोक माझ्या कामाची दखल घेऊ लागले. याआधी अर्थातच लोकांनी मला एक अभिनेता म्हणून पाहिले, पण माझा ‘डिरेक्टर बनने का कीडा’ पहिल्यापासून होता आणि या चित्रपटाने मला ती संधी दिली.”

देवेन यांनी आमिरसोबत काम करण्याच्या गोड आठवणी सांगितल्या आहेत. “चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आम्ही एक युनिट म्हणून बराच वेळ एकत्र घालवला. आम्ही बहुतेक उटी आणि कोडाईकनालमध्ये शूटिंग केले आणि आमिर आणि मला, दोघांनाही बुद्धिबळाची खूप आवड होती, म्हणून आम्ही आमच्या मोकळ्या वेळेत हा खेळ खेळायचो.”

“उटीमध्ये एक कुत्र्याचे पिल्लू होते ज्याच्यावर आमिरचा खरोखरच जीव जडला होता. तो सतत त्याच्याशी खेळायचा आणि खूप वेळ घालवायचा. जेव्हा आम्ही चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करत होतो, तेव्हा त्याने आजूबाजूला तो त्याला दत्तक घेऊ शकतो का? असे विचारले आणि लोकांना याचा खूप आनंद झाला आणि आमिरने त्या पिल्लाला मुंबईत आणले. त्याने त्याचे नाव पीनट ठेवले, त्यानंतर बराच काळ कुत्रा त्याच्यासोबत होता,” असेही देवेन म्हणाले.

आमिर हा एक गंभीर पद्धतीचा अभिनेता म्हणून ओळखला जात असला तरी तो सेटवर त्याच्या खोड्यांसाठीही खूप लोकप्रिय आहे. देवेन यांनी असाच एक प्रसंग सांगितला आहे. “मी सेटवर अगदी लहान असल्याने आणि सहाय्यक दिग्दर्शक म्हणून, माझ्याकडे सेटची बऱ्यापैकी जबाबदारी होती. आमिर सतत माझी खेचायचा. तो मला प्रश्न विचारायचा, ‘मी माझ्या शर्टाच्या बाहीचे दोन-तीन फोल्ड केले आहेत का? माझ्या शेवटच्या शॉटमध्ये कोणत्या रंगाचे मोजे होते? आणि मी, ‘मला सॉक्सच्या रंगाची पर्वा नाही. कारण ते दृश्यात दिसत नाहीत असे सांगायचो.”

पूजा बेदी, जिने चित्रपटात देविकाची भूमिका केली होती, तिला आमिरच्या संजूने चित्रपटात ‘गोल्ड डिगर’ म्हणून म्हटले होते. परंतु नंतर त्यांनी त्यांनी या कथेला ‘आर्ची कॉमिक’ सारखे म्हटले. MAMI च्या चर्चेत, पूजा बेदी यांनी म्हटले होते की ती ब्रॅटी वेरोनिका आहे आणि आमिर आर्ची आहे.

या चित्रपटाबद्दल, पूजाने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की,या चित्रपटाचा एक भाग असल्याचा तिला अभिमान कसा वाटतो. “हा एक मजेदार, स्वच्छ आणि शाळेतील दिवस, मैत्री, प्रेम आणि क्रश याविषयीची नॉस्टॅल्जियाने भरलेला चित्रपट आहे जो आपल्या प्रत्येकाच्या मनातील आहे,” असे पूजाने सांगितले होते.

गाण्यांनी चित्रपटाला अजरामर केले होते. विशेषत: पेहला नशा, जे अजूनही मूळ आणि अनेक रीमिक्स आवृत्तींमध्ये रेडिओवर वाजते. “हा चित्रपट माझ्या कारकिर्दीचा एक मोठा पॉइंट होता आणि माझा पहिला नशा मधील लाल ड्रेसने मला तीन दशकांपासून लोकांनी आठवणीत ठेवले आहे. जो जीता वही सिकंदर पाहिला असेल, तर गाण्यातील लाल ड्रेसने मला अमर केले आहे हे कोणीही विसरू शकत नाही. चित्रपटाचे शूटिंग करताना खूप मजा आली आणि माझ्या सार्वजनिक प्रतिमेसाठी आणि मला सर्वांच्या स्मरणात ठेवण्यासाठी आतापर्यंतची सर्वात चांगली गोष्ट होती,” असेही पूजा म्हणाली.