scorecardresearch

Premium

विश्लेषण: कधी बलात्काराचे आदेश तर कधी जिवंत जाळण्याची शिक्षा; आसाममधील घटनेनंतर चर्चेत आलेलं ‘कंगारू न्यायालय’ म्हणजे काय?

आसाममध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील नागाव जिल्ह्यात कंगारू न्यायालयाच्या आदेशावरून एका व्यक्तीला जिवंत जाळण्यात आलं आहे.

kangaroo court
प्रातिनिधीक फोटो

आसाममध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील नागाव जिल्ह्यात कंगारू न्यायालयाच्या आदेशावरून एका व्यक्तीला जिवंत जाळण्यात आलं आहे. एवढेच नाही तर संबंधित व्यक्तीचा मृतदेहही पुरण्यात आला होता. हे प्रकरण उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यातही घेतलं आहे.

याप्रकरणी पोलिसांचं मत काय?
उपविभागीय पोलीस अधिकारी एम दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागाव जिल्ह्यातील बोर लालुंग भागातील कंगारू न्यायालयात एका हत्येप्रकरणी सुनावणी सुरू होती. या सुनावणीदरम्यान आरोपी व्यक्ती हत्येप्रकरणी दोषी आढळल्यानंतर कंगारू न्यायालयाने संबंधित व्यक्तीला जिवंत जाळण्याचा आदेश दिला. त्यानुसार दोषीला सार्वजनिक ठिकाणी जिवंत जाळण्यात आलं. रणजीत बोरदोलोई असं मृत पावलेल्या व्यक्तीचं नाव आहे.

Gautami Patil
“आम्हाला वाचवण्याच्या ऐवजी बाउंसर…” गौतमी पाटीलनं सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली, “ती भीतीदायक परिस्थिती…”
gurupatwant singh pannu residence raid
Canada vs India: कॅनडात भारतीयांना धमकावणाऱ्या गुरपतवंत सिंग पन्नूच्या घरी NIA ची धाड; जप्तीची कारवाई!
disuza
वसईत पिता-पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत धक्कादायक कारण आलं समोर
justin trudea canada india conflict
Video: “जस्टिन ट्रुडोंनी फार मोठी चूक केलीये”, अमेरिकेतील अभ्यासकांनी सांगितलं कारण; म्हणे, “हे म्हणजे मुंगीनं…”!

कंगारू न्यायालय म्हणजे काय?
कंगारू न्यायालय हे भारतात हजारो वर्षांपासून अस्तित्वात आहे. पण काही वर्षाआधीच ही न्यायालये भारतात बेकायदेशीर ठरवण्यात आली असून त्यांना गुन्हेगारी श्रेणीत टाकण्यात आलं आहे. असं असूनही अजूनही गावपातळीवर ही न्यायालये सक्रिय आहेत. अशा न्यायालयात एखाद्या व्यक्तीला आरोपी मानून बेकायदेशीर किंवा असंवैधानिक पद्धतीने शिक्षा दिली जाते. कोणत्या तरी एकाच बाजूने हा निकाल सुनावला जातो. अशा न्यायालयांमध्ये पुराव्यांच्या आधारे निकाल सुनावला जात नाही, तर लोकांच्या दबावाखाली किंवा लोकांच्या भावनांचा प्रवाह लक्षात घेऊन निकाल दिला जातो.

हेही वाचा- विश्लेषण : सपा-काँग्रेसने शिंझो आबे यांच्या हत्येचा संबंध अग्निपथ योजनेशी कसा जोडला?

बिहार-पश्चिम बंगालमध्ये कंगारू न्यायालयाच्या सर्वाधिक घटना
एका अहवालानुसार, बिहार आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यांमध्ये कंगारू न्यायालये सर्वाधिक सक्रिय आहेत. या राज्यांमधून अनेकदा हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना समोर येत असतात. कंगारू न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, खून आणि बलात्कार करण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा- विश्लेषण : भारतीय तमिळ लोक म्यानमारच्या सीमेजवळील शहरात कसे गेले?

कंगारू न्यायालयाच्या आदेशानुसार दिलेल्या शिक्षा

  • काही दिवसांपूर्वी बिहारमधील गया जिल्ह्यात माओवाद्यांनी कंगारू न्यायालयाच्या आदेशानुसार एकाच कुटुंबातील चार जणांना फासावर लटकवलं होतं.
  • काही महिन्यांपूर्वी आसामसारखीच एक घटना पश्चिम बंगालमधील मालदा येथे घडली होती. येथील एका व्यक्तीला कंगारू न्यायालयाने जिवंत जाळण्याचे आदेश दिला होता. निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक लोकांनी संबंधित व्यक्तीला पेटवून दिलं होतं.
  • तर ओडिशातील मयूरभंज येथेही कंगारू न्यायालयाची क्रूरता पाहायला मिळाली होती. वेगवेगळ्या समाजातील तरुण-तरुणीचं प्रेमसंबंध उघडकीस आल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांचं मुंडन करून त्यांची रस्त्यावरून धिंड काढली होती.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-07-2022 at 16:01 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×