scorecardresearch

Premium

ओडिशामधील रेल्वे अपघात टाळता आला असता? ‘कवच’ प्रणाली कशी काम करते?

धोक्याचा सिग्नल ओलांडणाऱ्या रेल्वे गाड्यांना संरक्षण देणे आणि दोन गाड्यांमधील टक्कर टाळण्यासाठी रेल्वेने कवचप्रणाली विकसित केलेली आहे. दुर्दैवाने बालासोर येथे ही प्रणाली उपलब्ध नव्हती.

What is Railway Kavach Odisha Accident
ओडिशामधील भीषण अपघात कवच प्रणालीद्वारे रोखता येऊ शकला असता, असा युक्तिवाद काही लोक करत आहेत. (Photo – Reuters)

What is Kavach in Indian Railways : ओडिशाच्या बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वे अपघातावर अनेक प्रश्नचिन्हे उपस्थित केली जात आहेत. या अपघाताचे कारण काय? अपघात होण्यामागे कुणाची चूक होती? याची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. एका बाजूला अपघातात जखमी झालेल्यांना वाचविण्यासाठी ओडिशा आणि केंद्र सरकार हरएक प्रकारे मदत करत आहे. जखमींवर उपचार होत असलेल्या रुग्णालयांबाहेर रक्तदान करण्यासाठी लोकांच्या रांगा लागल्या आहेत. मानवतेसाठी हे सकारात्मक चित्र आहे. तरीही हा अपघात टाळता आला असता का? ज्या मार्गावर अपघात झाला तिथे रेल्वेची कवचप्रणाली का नव्हती, याबाबतचा प्रश्न उपस्थित होत आहे. रेल्वेचे प्रवक्ते अमिताभ शर्मा यांनी माहिती दिल्यानुसार या मार्गावर सदर कवच उपलब्धच नव्हते.

कवचप्रणाली काय आहे?

दोन रेल्वेंची धडक रोखण्यासाठी मार्च २०२२ साली ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन (ATP) प्रणालीची चाचणी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतली होती. एटीपीप्रणालीला रेल्वे अपघातांपासून बचाव करणारे ‘कवच’ म्हटले जाते. रेल्वेच्या रिसर्च डिझाइन ॲण्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशनने (आरडीएसओ) विकसित केलेली कवच संरक्षणप्रणाली स्वदेशी असून भारतीय रेल्वेने या तंत्रज्ञानाचा स्वीकार केलेला आहे.

harideep singh nijjar
पार्किंगजवळ अडवली गाडी, झाडल्या ५० गोळ्या; हरदीपसिंग निज्जरच्या हत्येचा थरारक घटनाक्रम वाचा!
Parineeti troll
“ही तर हद्द झाली…,” लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परिणीती चोप्रा ट्रोल, अभिनेत्रीबद्दल नाराजी व्यक्त करत नेटकरी म्हणाले…
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
sharad pawar narendra modi (1)
“पंतप्रधान मोदींचं ‘ते’ विधान क्लेशदायक”, शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका; दिले १९९३ च्या घडामोडींचे दाखले!

हे वाचा >> रेल्वे अपघात रोखण्यासाठी विशेष ‘कवच’; खुद्द रेल्वेमंत्र्यांनी घेतली चाचणी, पाहा Video

या प्रणालीवर २०१२ पासून काम सुरू झाले होते. त्या वेळी या प्रकल्पाचे नाव Train Collision Avoidance System (TCAS) असे देण्यात आले होते. ही प्रणाली विकसित करून रेल्वे अपघातांची संख्या शून्यावर आणण्याचे भारतीय रेल्वेचे ध्येय आहे. या प्रणालीची पहिली चाचणी २०१६ साली करण्यात आली होती. त्यानंतर त्यात आणखी सुधार करून २०२२ साली रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्याची पुन्हा सुरूवात केली.

कवचप्रणाली कशी काम करते?

कवचप्रणालीनुसार लोको पायलट वेगमर्यादेनुसार मेल-एक्स्प्रेस गाड्यांवर नियंत्रण ठेवू शकला नाही, तर कवचप्रणाली कार्यरत होऊन रेल्वे गाडीतील ब्रेक यंत्रणा सक्रिय होते आणि तात्काळ गाडी थांबते. यामुळे समोरासमोर येणाऱ्या किंवा मागून येणाऱ्या गाड्यांची टक्कर टळते. रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर थेट निरीक्षण ठेवणे, रेल्वे फाटकाजवळून जाताना स्वयंचलित शिटी वाजणे, आपत्कालीन परिस्थितीत संदेश देणे, लाल सिग्नल ओलांडण्यापासून रोखण्याचे काम ही कवच यंत्रणा करते. एखाद्या मार्गावर, रेल्वे गाडीत, रूळ आणि सिग्नलमध्ये ही यंत्रणा बसविण्यात येते.

एकाच ट्रॅकवर धावणाऱ्या दोन वेगवेगळ्या रेल्वेंवर तंत्रज्ञानाद्वारे नजर ठेवणे आणि त्यांना एकमेकांच्या हालचालींबाबत संदेश पोहोचवणे, हे या प्रणालीचे मुख्य काम आहे. जर एखादी रेल्वे चुकून सिग्नल तोडून पुढे निघाली, तर त्याच मार्गावरील इतर रेल्वे पाच किमी अंतरावर आपोआपच थांबविल्या जातात. म्हणून या यंत्रणेला ‘कवच’ असे समर्पक नाव देण्यात आलेले आहे. दुर्दैवाने भारतात सर्वच ठिकाणी ही यंत्रणा अद्याप बसविण्यात आलेली नाही. रेल्वेच्या काही विभागातच ही प्रणाली कार्यरत आहे.

हे वाचा >> Odisha Train Accident : दोन दशकानंतर देशातला सर्वात मोठा अपघात; याआधी शेकडो मृत्यू होणाऱ्या अपघातांची मालिका पाहा

२०२२ साली झाली चाचणी

अपघात रोखण्याच्या उद्दिष्टाने तयार केलेल्या कवचाची सिकंदराबाद येथे प्रत्यक्ष चाचणी घेण्यात आली. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वाखाली लोको पायलट आणि चाचणीसाठी इतर अधिकारी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री वैष्णव यांनी या चाचणीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. एका मिनिटाच्या व्हिडीओमध्ये कवचप्रणालीची यशस्वी चाचणी दाखवण्यात आली आहे. क्लिपची सुरुवात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे. यात ज्या ट्रेनमध्ये ते आहेत, त्याच ट्रॅकवर विरुद्ध दिशेने येणारी दुसरी ट्रेन दाखवली आहे.

या मार्गावर ही यंत्रणा बसविण्यासाठी एकूण १६.८८ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. त्यानंतर नवी दिल्ली-हावडा आणि नवी दिल्ली-मुंबई या मार्गावरही कवचप्रणाली बसविण्याचे काम सुरू आहे. मार्च २०२४ पर्यंत हे काम पूर्ण होण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या मार्गावर बसविण्यात येणाऱ्या प्रणालीचा अभ्यास करून इतर ठिकाणी त्याचा विचार केला जाणार आहे.

कवचप्रणालीमुळे ओडिशाचा अपघात टळला असता?

ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यात रेल्वेचा भीषण अपघात झाल्यानंतर कवचप्रणालीची चर्चा होत आहे. मागच्या दोन दशकांतील सर्वात भीषण असा हा अपघात आहे. तीन रेल्वे एकापाठोपाठ एकमेकांवर आदळल्याने मोठा अपघात झाला. हा लेख पूर्ण करीपर्यंत मृत्यूचा आकडा २६१ पर्यंत लांबला होता. तर जखमी प्रवाशांची संख्या ९०० हून अधिक आहे. कवचप्रणालीमुळे हा अपघात टळला असता, अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे. तरीही यातील तांत्रिक बाबी काय आहेत, हे उच्चस्तरीय चौकशीनंतरच कळू शकतील. एवढ्या मोठ्या प्रमाणात होणारी जीवितहानी टाळण्यासाठी रेल्वेकडून ठोस उपाययोजना व्हायला हव्यात, अशी भावना यानिमित्ताने व्यक्त केली जात आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-06-2023 at 14:40 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×