असे का होते?
आयुर्वेदानुसार ग्रीष्म ऋतूतील उष्णता तसेच, खाल्ल्या जाणाऱ्या आम्ल, शीत व द्रव पदार्थामुळे काही व्यक्तींमध्ये हे लक्षण पाहावयास मिळते.
उपाय काय?
* लक्षण दिसताक्षणी झोपावे व मध्यावर थंड पाण्याची धार धरावी.
* रक्त थांबल्यानंतर साजूक गाईचे तूप २-२ थेंब दोन्ही नाकपुडीत
सोडावे.
* थंड दूध किंवा डािळबाचा रस प्यायला द्यावा. वारंवार तक्रार असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा.
यामुळे काय होते?
रक्तप्रवाह थांबतो व शरीरातील उष्णता कमी होते.

इतर काय काळजी घ्यावी?
* लोणचे, दही, तिखट पदार्थ खाऊ नयेत.
* लसूण, शेवया, मेथी यांचा वापर टाळावा.
* आहारात दूध, तूप, पुदिना यांचा वापर करावा.
* उन्हात फिरू नये.
वैद्य सदानंद सरदेशमुख

SaReGaMaPa Little Champs Winner singer Kartiki Gaikwad home photos
लवकरच आई होणाऱ्या कार्तिकी गायकवाडचं घर आहे खूपच सुंदर, पाहा फोटो
priya bapat reacts on not having baby
लग्नाला १३ वर्षे होऊनही बाळ नाही, प्रिया बापट म्हणाली, “ज्यांना मुलं नकोयत…”
नाकातून रक्त येण्याची ‘ही’ आहेत कारणे आणि उपाय
नाकातून रक्त आलं?