असे का होते? आयुर्वेदानुसार ग्रीष्म ऋतूतील उष्णता तसेच, खाल्ल्या जाणाऱ्या आम्ल, शीत व द्रव पदार्थामुळे काही व्यक्तींमध्ये हे लक्षण पाहावयास मिळते. उपाय काय? * लक्षण दिसताक्षणी झोपावे व मध्यावर थंड पाण्याची धार धरावी. * रक्त थांबल्यानंतर साजूक गाईचे तूप २-२ थेंब दोन्ही नाकपुडीत सोडावे. * थंड दूध किंवा डािळबाचा रस प्यायला द्यावा. वारंवार तक्रार असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा. यामुळे काय होते? रक्तप्रवाह थांबतो व शरीरातील उष्णता कमी होते. इतर काय काळजी घ्यावी? * लोणचे, दही, तिखट पदार्थ खाऊ नयेत. * लसूण, शेवया, मेथी यांचा वापर टाळावा. * आहारात दूध, तूप, पुदिना यांचा वापर करावा. * उन्हात फिरू नये. वैद्य सदानंद सरदेशमुख