कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुक्काम असलेल्या शासकीय विश्राम गृह परिसरात घोडी उधळण्याचा प्रकार घडला आहे. दोन घोडे विश्रामगृहाच्या परिसरात एकत्रित दौडत असल्याचे चित्र पाहून बघ्यांची करमणूक झाली. तर हे घोडे बंदोबस्त असतानाही या परिसरात कसे आले याचा शोध घेतला जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सुरुवातीला त्यांनी शासकीय विश्रामगृहावर आढावा बैठक घेण्यास सुरुवात केली आहे. ही बैठक सुरू असतानाच बाहेर एक भलताच प्रकार घडला.
विश्रामगृहाच्या अगदी समोरच दोन घोड धावताना दिसत होते. पांढऱ्या व करड्या रंगाचे हे अश्व दौडताना पाहून अनेकांची करमणूक झाली. ते विश्रांम गृहाच्या समोर तसेच त्यासमोर विश्र समोरच असलेल्या गवतामध्ये दोघे फिरत राहिले. त्यांची पळापळ पाहून यंत्रणेचे ही धावपळ उडाली. या दोन्ही घोड्यांना यशावकाश ताब्यात घेतले आहे. तरी ही उपमुख्यमंत्र्यांचा दौरा असतानाही ते या परिसरात कसे आले याचा आता शोध घेतला जात आहे.
अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सोमवारी (२५ ऑगस्ट) पी. एन. पाटील गटाचा प्रवेश निश्चित झाला आहे. तथापि, करवीर विधानसभा निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाटील गट म्हणून लढण्यावर ठाम आहोत, असे मत जिल्हा काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. त्यांची ही भूमिका पाहता आगामी काळात करवीर विधानसभा मतदारसंघात जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष पी. एन. पाटील यांचा गट आणि एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांच्यातील संघर्ष कायम राहण्याची चिन्हे आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात पी. एन. पाटील गटाचा प्रभाव कायम राहिला. त्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून वीस वर्षे काम केले. गेल्या वर्षी त्यांचे निधन झाल्यानंतर विधानसभा निवडणूक त्यांचे सुपुत्र राहुल पाटील हे विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर आता त्यांनी राजकीय वाट बदलली आहे. याबाबत राहुल पाटील, राजेश पाटील या बंधूंनी सांगितले की, २५ ऑगस्ट रोजी अजित पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये सडोली (ता. करवीर ) येथे राष्ट्रवादी पक्ष प्रवेश होणार आहे.
भोगावती साखर कारखान्याच्या आर्थिक अडचणी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या माध्यमातून सोडविण्याचे आश्वासन अजित पवार यांनी दिले आहे. पूर्वी दिवंगत नेते विलासराव देशमुख हे पी. एन. पाटील गटाचे आधारस्तंभ होते. आता ती भूमिका अजित पवार हे निभावणार आहेत, असेही राहुल पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी भोगावतीचे अध्यक्ष प्रा. शिवाजी पाटील, शंकरराव पाटील, गोकुळचे संचालक बाळासाहेब खाडे आदी उपस्थित होते.