विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कोल्हापूर दौऱ्यात शिवसेनेतील दोन गटातील संघर्ष शिगेला पोहोचला. गुरुवारी सायंकाळी एका भेटीच्या निमित्ताने दानवे यांना माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या समर्थकांनी रोखण्याचा प्रयत्न केला.  शिवसैनिक असले प्रकार खपवून घेत नाहीत असे म्हणत दानवे यांनी त्यांना उत्तर दिले. दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने एकच तणाव निर्माण झाला होता.

हेही वाचा >>> कोल्हापूरच्या सुपुत्राची युनायटेड किंग्डम सरकारच्या विशेष सल्लागारपदी नियुक्ती

caste census, Rahul Gandhi, Rahul Gandhi in Kolhapur,
मोदींनी कितीही विरोध केला तरी जाती जनगणना करणारच – राहुल गांधी
rahul gandhi in kolhapur
“शिवाजी महाराजांचा विचार म्हणजेच संविधान, पण या संविधानाला…”;…
Rahul Gandhi will visit Kolhapur for two days from today
राहुल गांधी आजपासून दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर
Chaitanya Parva of Navratri begins in Kolhapur
कोल्हापुरात नवरात्रीच्या चैतन्यपर्वास प्रारंभ
gold-plated prabhawal offered to Mahalakshmi
कोल्हापूर : सोन्याचा मुलामा दिलेली प्रभावळ महालक्ष्मीला अर्पण
Yarn mills in the state are on the verge of closure
राज्यातील सूतगिरण्या बंद पडण्याच्या मार्गावर!
kolhapur Warana Dudh Sangh marathi news
वारणा दूध संघामार्फत जातीवंत म्हैस संवर्धन, विक्री केंद्राची उभारणी; ४२ हजारांचे अनुदान देणार – विनय कोरे
Kolhapur plant butterflies marathi news
एक वनस्पती… फुलपाखरांच्या ४२ प्रजातींची लाडकी; आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत संशोधन प्रसिद्ध
Kolhapur hasan mushrif marathi news
गुरुदक्षिणेऐवजी देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसला, हसन मुश्रीफ यांचे समरजित घाटगेंवर टीकास्त्र

दानवे यांच्या जनता दरबारात एका तक्रारीच्या निमित्ताने वातावरण तापले होते. क्षीरसागर यांच्या शेजारी राहणारे वरपे कुटुंबीयांनी त्यांच्याविरोधात मारहाण केल्याची तक्रार करूनही कसलीही कारवाई होत नसल्याचे गाऱ्हाणे मांडले. त्यावर दानवे यांनी कोल्हापूरचे पोलिस अधिक्षक महेंद्र पंडित यांना फोन राजेश क्षीरसागर यांनी मारहाण केली असताना त्यांच्यावर गुन्हा का दाखल केला नाही, अशी विचारणा केली. शिवाय, तुमची आणि राजेश क्षीरसागर यांची मस्ती अजिबात चालणार नाही, गुन्हा दाखल करा, असे सुनावले. 

हेही वाचा >>> “महाराष्ट्र हे गुंड, भूमाफिया, खंडणीबहाद्दरांचे राज्य बनले आहे”, अंबादास दानवे यांची कोल्हापुरात टीका

आपल्या विरोधात दानवे यांनी एकेरी भाषा वापरल्याने क्षीरसागर संतप्त झाले होते. वरपे यांच्या भेटीला दानवे सायंकाळी जाणार होते. तत्पूर्वी क्षीरसागर समर्थकांनी दानवे यांच्या विरोधात घोषणा पाहिजे सुरू केली.  मागीलदाराने विधान परिषदेत गेलेले अंबादास दानवे यांना समाजमनाची माहिती नाही. सावकारी करणारे वर्पे यांची बाजू घेऊन  ते पोलिसात तक्रार करतात हे अशोभनीय आहे ,अशी टीका क्षीरसागर यांनी केली. क्षीरसागर यांनी जमाव जमावल्याचे लक्षात आल्यानंतर दानवे यांनी त्यांनी १०० माणसे जमावावित की  दोन हजार. मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे. न घाबरता तेथे जाणारच ,असा निर्धार केला. दानवे तेथे पोहोचले तेव्हा पुन्हा जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. तणावपूर्ण वातावरणात पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली.