कोल्हापूर : श्री अंबाबाई मंदिर येथील जोतिबा रोड येथे भुयारी गटार योजनेचे काम सुरु आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खोदकाम केल्याने या रस्त्यावर खरमाती व मलब्याचे ढीग साचले आहेत. यामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांना कसरत करावी लागत आहे. तसेच, परिसरातील दुकानांच्या समोरच खरमातीचे ढीग लावून ठेवल्याने व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने आम आदमी पार्टीने अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

हेही वाचा : “दुर्बिणीने शोधूनही माझ्या हाताला डाग सापडणार नाही”, राजू शेट्टी यांचा दावा

Leopard Nate area, Ratnagiri, Leopard, loksatta news,
रत्नागिरी : नाटे परिसरात दिवसाढवळ्या बिबट्याची दहशत, विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात वन विभागाला यश
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Extra bus service for Saptshrung Fort in navratri 2024
नाशिक : सप्तश्रृंग गडासाठी जादा बससेवा
Deonar Pada cemetery, Deonar Pada cemetery lights,
मुंबई : देवनार पाडा स्मशानभूमी अंधारात, विजेचे दिवे बंद असल्याने नागरीकांना मनस्ताप
villagers protested against daighar garbage project
ठाण्यात पुन्हा कचराकोंडीची चिन्हे; डायघर प्रकल्पास ग्रामस्थांचा विरोध, देयके मिळत नसल्याने ठेकेदाराने रोखल्या घंटागाड्या
ex corporator demand compensation for jogeshwari residents for suffer heavy loss due to rain
अतिवृष्टीबाधित जोगेश्वरीवासियांना नुकसान भरपाई द्या- जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
entrepreneurs staged rasta roko protest against pcmc for not picking up waste in bhosari midc
पिंपरी : औद्योगिक परिसरात कचऱ्याचे ढीग; एमआयडीतीसील उद्योजकांचे आंदोलन
person who stole jewellery from devotees was arrested in Lalbagh
लालबागमध्ये भाविकांचे दागिने चोरणाऱ्याला अटक, आरोपी सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी

जोतिबा रोडवरील व्यापाऱ्यांना लाखो रुपयांचे भाडे द्यावे लागते. संथगतीने सुरु असलेल्या खोदकामामुळे येथील व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे खरमाती त्वरित उचलून तेथे फेन्सिंग करावे अशी मागणी आम आदमी पक्षाकडून करण्यात आली. एप्रिल महिन्यात होणाऱ्या रथोत्सवासाठी घाटी दरवाजा हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे येथील गटारीचे काम त्यापूर्वी होणे गरजेचे असल्याचे आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी सांगितले. यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, व्यापारी आघाडी अध्यक्ष राजेश खांडके, अभिजित भोसले, समीर लतीफ, संजय केसरकर, अर्जुन गोसावी, मदन जाधव, शिरीष पाटील, सिद्धार्थ गवळी व इतर व्यापारी उपस्थित होते.