कोल्हापूर: पावसाळा आला की कोल्हापूर महानगरपालिकेने केलेल्या रस्त्यांवर खड्डे पडतात. याच खड्ड्यांचा निषेध म्हणून आम आदमी रिक्षाचालक संघटने सभासद असणाऱ्या रिक्षाचालक हणमंत जाधव यांनी आपल्या रिक्षावर मार्मिक संदेश लिहला असून त्याची खुमासदार चर्चा होत आहे. ‘ पाण्यात लवकर विरघळणारा पदार्थ मीठ की साखर? असा प्रश्न विचारला आहे. त्याचं उत्तर लिहलंय ‘महानगरपालिकेचा डांबर’. अशापद्धतीने महानगरपालिकेच्या दर्जाहीन काम चव्हाट्यावर आणून रिक्षाचालक जाधव यांनी महापालिकेच्या भोंगळ कारभार सगळ्यांसमोर आणला आहे.

संघटनेचे मार्गदर्शक संदीप देसाई यांनी जाधव यांची भेट घेऊन महापालिकेचा कारभार उघड करण्याचं धाडस केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तर समाज माध्यमातून ही या मार्मिक टिपणीवर शहरवासीयांनी महापालिकेच्या कारभारावर टीकेचा सुरू लावला आहे.